Skip to main content

१४ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोहत्सव साजरा होणार- गौतम खरात

 घोडेगाव प्रतिनिधी:



युगप्रवर्तक प्रतिष्ठाण संचलित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जयंती मोहत्सव समितीचे अध्यक्ष अमित (भाऊ) रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक पार पडली या वर्षी दरवर्षी प्रमाणे  घोडेगाव या तालुक्याच्या ठिकाणी दिनांक १४ एप्रिल २०२२  रोजी  महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोहत्सव साजरा होणार असल्याची माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिली यावेळी दोन वर्षे कोरोना संकट संपूर्ण मानव जातीवर आले होते त्यामुळे मागील दोन वर्षे जयंती धुमधडाक्यात साजरी करता आली नव्हती परंतु आता कोरोना संकट जवळजवळ दूर झाले असून या वर्षी जयंती चांगल्या प्रमाणात करण्याचे सर्वच सदस्यांनी सांगितले यावेळेस कोरोना काळात ज्या लोकांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे मग त्या मध्ये डॉकटर,नर्स, परिचारिका,अंबुलन्स  ड्रायव्हर,सामाजिक कार्यकर्ते ,सेवाभावी संस्था,पोलीस विभागातील कर्मचारी ,अधिकारी  लॉकडाऊन काळात अन्नदान करणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात येणार असून आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  भूमिपुत्रांना आंबेगाव भूषण  पुरस्कार २०२२ वितरण सोहळा आयोजन करण्यात येणार  आहे या मध्ये सामाजिक ,शैक्षणिक,

क्रीडा, कला,प्रशासकीय सेवा ,वैद्यकीय,विधीतज्ञ, इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून  घोडेगाव शहरातून भव्य बाईक रॅली ,भव्य मिरवणूक( सवरगंधर्व बेंजो अवसरी खुर्द, तुकाई ढोल ताशा पथक कोटमदरा, जालिंदर शेवाळे यांचा सुप्रसिद्ध पारंपारिक ताफा , उंट,घोडे यांच्या समवेत,फटाक्यांची आतिषबाजी,विद्युत रोषणाई  प्रसिद्ध व्याख्याते प्रा तानाजी बोऱ्हाडे यांचे भीमा तुझ्या जन्मामुळे..... या विषयावर व्याख्यान व मास्टर किरण महाजन यांचा भीमगीतांचा सदाबहार कार्यक्रम} होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री मा ना दिलीपराव वळसे पाटील ,शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सामाजिक न्याय चे राज्य प्रमुख ऍड जयदेव गायकवाड ,युवा  नेतृत्व मा पूर्वाताई वळसे पाटील ,सर्व संस्थांचे अध्यक्ष,सभापती संचालक

तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार असून कार्यक्रम धुमधडाक्यात होणार असल्याची माहिती अध्यक्ष अमित(भाऊ) रोकडे यांनी दिली.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.