Skip to main content

जुन्नरमधील इच्छुकांना निवडणुकीचे वेध

 जुन्नर प्रतिनिधी:

जुन्नर नगर पालिकेच्या प्रारूप रचनेचा आराखडा दोन मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीचे इच्छुकांना वेध लागले आहेत.या आराखड्यास ७ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी मान्यता देणार असून, १० मार्चपर्यंत नागरिकांच्या माहितीसाठी प्रभाग रचना व मार्गदर्शक नकाशे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रभाग रचनेवर नागरिकांना १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना घेता येतील. हरकती व सूचनांवर २२ मार्चपर्यंत सुनावणी होईल. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने २५ मार्चपर्यंत पालिका प्रशासनाला अहवाल मिळणार असून, एक एप्रिलला राज्य निवडणूक आयोगाची प्रभाग रचनेस अंतिम मान्यता मिळणार आहे. अंतिम अधिसूचना ५ एप्रिलपर्यंत प्रकाशित करण्यात येणार आहे. जुन्नर नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत ९ जानेवारीला संपली आहे. त्यामुळे इच्छुकांचे डोळे नगर पालिकेच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे लागले आहेत.

सदस्य संख्येत तीनने वाढ

नवीन प्रभाग रचनेत पालिकेच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे. राज्य सरकारच्या २ नोव्हेंबर २०२१ च्या अध्यादेशानुसार वर्गासाठी सदस्य संख्येत तीनने वाढ करण्यात आली आहे. तसेच, किमान संख्या २० व २५ पेक्षा अधिक नसावी, असे नमूद केले आहे. जुन्नरची २०११ ची लोकसंख्या २५ हजार ३१५ इतकी आहे. ही लोकसंख्या गृहीत धरून कच्ची प्रभाग रचना केली असल्याचे समजते. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य याप्रमाणे दहा प्रभागात २० सदस्य आगामी रचनेत असतील. प्रत्येक प्रभाग सुमारे २ हजार ५०० लोकसंख्येचा असेल. यात सुमारे २२ हजार मतदार अपेक्षित आहेत. जुन्नर नगर पालिकेची सदस्य संख्या तीनने वाढली असली; तरी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेत वाढ होणार नसल्याचे सांगण्यात आले.अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ५ व खुल्या वर्गासाठी दहा जागा राहतील. यात महिलांसाठी दहा जागा राखीव असतील.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.