Skip to main content

थोरांदळे शाळेच्या संतोष गवारी सर यांना जिल्हास्तरीय व मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार प्राप्त

मंचर:प्रतिनिधी


पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ माननीय नामदार श्री .अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते अल्प बचत भवन पुणे येथे पार पडला . यावेळी आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे शाळेचे आदर्श शिक्षक श्री संतोष कृष्णा गवारी यांना जिल्हास्तरीय पुरस्कार व शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेआहे .   कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ . निर्मलाताई पानसरे त्याचप्रमाणे माननीय श्री .आयुष प्रसाद साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे , माननीय श्री . रणजीत शिवतारे उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद पुणे हे कार्यक्रमात उपस्थित होते .

संतोष गवारी सर यांनी थोरांदळे शाळेमध्ये विविध उपक्रम तसेच उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला .

   गेल्या दहा वर्षांमध्ये थोरांदळे येथे त्यांनी एकूण ८८लाख ६३९रुपये निधी रोख आणि वस्तू स्वरूपात शाळेला मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे .

     त्याच प्रमाणे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी २००पेक्षा अधिक बक्षिसे मिळवली आहेत . त्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे .

    सतत चार वर्ष जिल्हा स्पर्धेत आंबेगाव तालुक्यातील खो-खो टीमचे नेतृत्व आणि यश संपादन केले आहे सन - २०१५ / १६ चा जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त करण्यामध्ये उल्लेखनीय  काम केले आहे .

त्याच प्रमाणे सन - २०२० /२१मध्ये एन एम एम एस परीक्षेमध्ये चार विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आले असून  शाळेचे १००% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .

 तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहा विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आले आहेत . तसेच २०१५ / १६ मध्ये नवोदय विद्यालय प्रवेश साठी एक विद्यार्थिनी ची निवड झाली होती . मंथन परीक्षा मध्ये यश संपादन केले आहे .

   मुळशी तालुक्यातील वळणे तसेच थोरांदळे या ठिकाणी निर्मलग्राम करण्यासाठी लोक जागृती केली  आहे स्वच्छ सुंदर शाळा सहभाग घेतला आहे .

 सलग बारा वर्षे अतिउत्कृष्ट कामकाज .

 १००% पटनोंदणी उपस्थिती .

 दरवर्षी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हे कार्य केले आहे .

    शाळेत कार्यानुभव विषयांतर्गत गांडूळ खत प्रकल्प , सेंद्रिय शेती उपक्रम यशस्वीरीत्या राबवून जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे .

    इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम शाळेचा सहभाग .

    तसेच लीला लीला पूनावाला फाउंडेशन , पायजाम फाउंडेश , तसेच सेवाभावी संस्था व दानशुर ग्रामस्थांकडून कडून विशेष मदत मिळवून देण्यासाठी व्यवस्थापन व ग्रामपंचायतीच्या मदतीने विशेष प्रयत्न केले आहे . 

       विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून शाळा महाराष्ट्र राज्य मॉडेल स्कुल बनविण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे .

   यापूर्वी त्यांना आंबेगाव तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार .

    साई समर्थ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार . 

जुन्नर तालुका कला अध्यापक संघाकडून सन २०१७ / १८ मध्ये गुणवंत कलाध्यापक पुरस्कार .

 राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (एनसीआरडी )यांच्याकडून उपक्रमशील शिक्षक पुरस्कार . थोरांदळे ग्रामस्थांच्या वतीने उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मानित .

 आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेकडून नवोदय परीक्षा मार्गदर्शक म्हणून सन्मानित तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक म्हणून सन्मानित .

 जिल्हा शैक्षणिक संस्था व्यवसायिक शिक्षण यांच्या मार्फत नवोदय उपक्रम स्पर्धेमध्ये जिल्ह्यात क्रमांक .

 सन २०१८ / १९चा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार .

तंत्र डिजिटल शैक्षणिक मासिक यांच्या तर्फे दिला जाणारा  लीडर अवार्ड ने सन - २०२० / २१ मध्ये सन्मानित .

 आंबेगाव तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक .

यासारखे एकूण सतरा पुरस्कार मिळालेले आहेत .

 याच कामाची नोंद घेऊन पुणे जिल्हा परिषदेने यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार व शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी  गावचे ग्रामस्थ , व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.मंगेश फुटाणे , श्री . नितीन टेमगिरे सदस्य, श्री . रामदास टेमगिरे माजी अध्यक्ष आंबेगाव शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री . ठकसेन गवारी, श्री .प्रकाश गोफणे , श्री .अरविंद मोडवे , श्री . सखाराम वाजे , श्री .चेतन बेंढारी सर उपस्थित होते .

        पुरस्कार मिळाल्या बद्दल दिलीपराव वळसे पाटील साहेबांचे स्वीय सहाय्यक दांगट साहेब तसेच मा .श्री .प्रदीपदादा वळसे पाटील साहेब , मा . श्री .गोविंद शेठ खिलारी साहेब , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश टेमगिरे नटवरलाल गवारी आदिवासी समाजाचे युवानेते मारुती दादा केंगले तळेघरचे युवानेते संदीप मोरमारे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.