Skip to main content

हळदीला तलवारींसह डान्स, ‘लग्नाच्या बेड्या’ पडता-पडता नवरदेवाला पडल्या पोलिसांच्या बेड्या

लातूर प्रतिनिधी :

बोहल्यावरुन चढून लग्नाच्या बेड्या घालण्याच्या तयारीत असलेल्या लातूरमधील नवरदेवाला अखेर पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवारी घेऊन नाचणे नवरदेव आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार आणि कोयते घेऊन नाचणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यातील पाच जणांना आधीच अटक करण्यात आली होती. तर ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरदेव फरार झाला होता. लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात काही युवक हळदीच्या कार्यक्रमात धिंगाणा घालत होते. मोठ्या कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन त्यांचा डान्स सुरु होता. 16 फेब्रुवारीच्या रात्री हा हळदीचा कार्यक्रम झाला होता.

हळदीच्या धिंगाण्यात पोलिसांची एन्ट्री

हळदी समारंभाच्या नावाखाली धिंगाणा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचं पाहताच नाचणाऱ्यांची धावपळ सुरु झाली.

सात जणांवर गुन्हा, नवरदेव फरार

तलवारी ताब्यात घेऊन पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातल्या पाच जणांना विवेकानंद चौक पोलिसांनी अटकही केली. मात्र नवरदेव शुभम तुमकूटे हा फरार झाला होता. ऐन लग्नाच्या दिवशीच पसार होण्याची वेळ नवरदेवावर त्याच्या मित्रांमुळे आली आहे.

विवेकांनद चौक पोलिसांनी कारवाई करत अखेर नवरदेवाला बेड्या ठोकल्या, त्याच्या तीन मित्रांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती आहे.

तलवार डान्सचा ट्रेण्ड

हातात तलवारी घेऊन हळदीत नाचणे किंवा लग्नाच्या मिरवणुकीत नाचण्याची फॅशन लातूरमध्ये पहायला मिळत होती. आता पोलिसांच्या या कारवाईने तलवारी नाचवण्याच्या प्रकारावर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.