Skip to main content

आमदार बोरनारे प्रकरणी सात दिवसात अहवाल सादर करा, भावजयीला मारहाण प्रकरणी पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

औरंगाबाद प्रतिनिधी:

वैजापूर शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी भावजयीला मारहाण केल्याप्रकरणी येत्या सात दिवसात चौकशीचा अहवाल सादर करा, असे आदेश देण्यात आले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलीस अधीक्षक निमित गोयल यांना हे आदेश दिले आहेत. कायदा सर्वांसाठी समान असतो, त्यामुळे या प्रकरणात दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असं अश्वासन पोलीस महानिरीक्षकांनी दिलं आहे. राजकीय दबावापोटी वैजापूरचे पोलीस ठोस भूमिका घेत नाहीयेत, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. भाजपच्या चित्रा वाघ  यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

वैजापूर पोलिसांच्या भूमिकेवर संशय

18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील कार्यक्रमात आमदार बोरनारे यांच्या भावजय जयश्री बोरनारे उपस्थित होत्या. तुम्ही भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या, असा सवाल करत आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार जयश्री बोरनारे यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आमदार बोरनारे यांनी खासगी सचिवाला पुढे करून मारहाण झालेल्या फिर्यादिवरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले, असाही आरोप केला जात आहे. भाजपने वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी पोलिसांनी भेट घेतली असता राजकीय दबावापोटी पोलीस सौम्य कारवाई करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. या प्रकरणी पीडितेविरुद्धचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेऊन आमदार बोरनारे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

आमदार बोरनारे प्रकरणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. तसेच भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करीत पीडितेविरुद्धचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा व आमदार बोरनारे यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध विनय भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. या प्रकरणी पोलीस महानिरीक्षकांनी सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निमित गोयल यांना दिले आहेत.

                     

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.