Skip to main content

चंपा चौकात राडा, हातात तलवार घेऊन वाहनांची तोडफोड, दुकाने बंद करण्याची धमकी!

 समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

औरंगाबाद शहरातील चंपा चौक परिसरात गुरुवारी रात्री गुंडांनी हातात तलवारी घेऊन काही वाहनांची तोडफोड केली. खुनाच्या गुन्ह्यातून आठ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेल्या अशफाक पटेल या गुन्हेगाराने दोन ते तीन साथीदारांसह चंपा चौकात हा प्रकार घडवला. हातात तलवारी घेऊन आलेले हे लोक दुकाने बंद करण्याची धमकी देत होते. हातात असलेल्या तलवारींनी ते वाहनांची नासधूस करू लागले. या घटनेत दोन वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे व्यावसायिकांनी घाबरून दुकाने बंद केली, काहींनी दुकाने तशीच सोडून पळ काढला. या घटनेमुळे गुरुवारी रात्री परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तणाव निवळला, पण शहराती गुंडगिरीनं मर्यादा ओलांडल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळाले.

काय घडलं गुरुवारी रात्री?

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री नऊ वाजता चंपा चौकातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरु होती. दुकानात ग्राहकांची गर्दी होती तर रस्त्यावरही अनेक वाहनांची ये-जा सुरु होती. तवेढ्यात पटेल आणि त्याच्या टोळक्याने हवेत तलवारी भिरकावत व्यावसायिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकाने बंद करण्याच्या धमक्या सुरु केल्या. तलवारींनी वाहनांवर वार करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त दीपक गिऱ्हे, निरीक्षक अशोक गिरी, विनोद सलगरकर, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, रोहित गांगुर्डे यांच्यासह दंगा नियंत्रक पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हे टोळकं निघून गेलं होतं.

आठ दिवसांपूर्वी जामीनावर सुटका

या घटनेतील मुख्य आरोपी अशफाक हा सिटी चौक ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो एका खुनाच्या गुन्ह्यातून आठ दिवसांपूर्वीच जामीनावर सुटला आहे. तीन दिवसांपूर्वीच त्याची दुसऱ्या एका टोळीसोबत हाणामारी झाली होती. तेव्हा त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्यानंतर तो थेट तलवार घेऊन रस्त्यावर उतरला. गेल्या काही दिवसांत शहराच्या विविध भागात गुंडगिरीचे प्रमाण वाढले असून नशेखोरीमुळे या घटना घडत आहेत, हे प्रकर्षाने जाणवत आहे.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.