Skip to main content

अनोख्या लग्नाची गोष्ट ; 73 वर्षीय वडील व 68 वर्षीय आई अडकले लग्नाच्या बेडीत

शिरुर प्रतिनिधी

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा आनंदी क्षण मात्र काहींना आपल्या लग्नामध्ये हौस मौज करणे शक्य नसते.  परंतु पुणे जिल्हातील एका कुटुंबाने आपल्या 73  वर्षीय वडील व 68 वर्षीय आईच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुन्हा पूर्णपणे वैदिक पद्धतीने विवाह करत साजरा केला. आई वडिलांना पन्नास वर्षानंतर एक अनोखी भेट दिल्याचे पाहायला मिळाले, पुण्याच्या शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर येथील प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल थोरवे यांच्या आई माणिकबाई व वडील रामदास यांचा १९७२ सालच्या दुष्काळात विवाह झाला होता. दुष्काळ असल्याने त्यांचा विवाह हा सध्या पद्धतीने झाला. त्यांनतर या दाम्पत्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून कष्टाने संसार उभा करून आपल्या दोन मुले, दोन मुलींचे शिक्षण करत त्यांचाही संसार उभा करून दिला.आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची जाणीव त्यांच्या चारही मुलांना आहे. यातूनच त्यांनी आई वडिलांच्या ;लग्नाचा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा करायचा ठरवले


अन पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला


आई वडील नेहमी त्यांना त्यांच्या जून्या दिवसांचे धडे देत होते.तसेच समाजामध्ये वावरत असताना होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पाहून आपल्या आई वडिलांचा बाबतीत असा कोणताच आनंदाचा कार्यक्रम कधी झाला नसल्याची सल या चारही भावंडांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी आपल्या आई वडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या थाटात करत आई वडिलांचा पुन्हा विवाह करण्याचा निर्णय अविनाश थोरवे, अतुल थोरवे, वैशाली आदक, अर्चना येन्धे या चारही मुलांनी घेतला. आणि वऱ्हाडीमंडळी सह मोठ्या थाटात हा विवाह समारंभ पार पडला

आई – वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला

पुन्हा एकदा आई-वडिलांचा वाजत गाजत विवाह सोहळा साजरा केला.साखरपुडा,हळदी समारंभ ते थेट बिदाई असा अनोखा कार्यक्रम केला मोठी वरात ही काढण्यात आली यावेळेस आई वडिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला या लग्न समारंभानंतर संपूर्ण थोरवे कुटुंब भाउक झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र मुलांनी एवढ्या मोठ्या उत्साहात पुन्हा विवाह सोहळा साजरा केल्याने आईला व वडिलांना एक अनोखी भेट दिली असल्याचे आई माणिकबाई यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांची मुले, मुली, नातू पाहुणे मित्र मंडळ मोठ्या संख्येने हजेरी लावली खरी..मात्र थोरवे कुटुंबीयांचा हा आनंद पाहून आपल्याही आई वडिलांना असा आनंद देण्याचा मोह कुणालाच आवरणार नाही हे मात्र तितकेच खरे.

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.