Skip to main content

अनोख्या लग्नाची गोष्ट ; 73 वर्षीय वडील व 68 वर्षीय आई अडकले लग्नाच्या बेडीत

शिरुर प्रतिनिधी

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा आनंदी क्षण मात्र काहींना आपल्या लग्नामध्ये हौस मौज करणे शक्य नसते.  परंतु पुणे जिल्हातील एका कुटुंबाने आपल्या 73  वर्षीय वडील व 68 वर्षीय आईच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुन्हा पूर्णपणे वैदिक पद्धतीने विवाह करत साजरा केला. आई वडिलांना पन्नास वर्षानंतर एक अनोखी भेट दिल्याचे पाहायला मिळाले, पुण्याच्या शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर येथील प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल थोरवे यांच्या आई माणिकबाई व वडील रामदास यांचा १९७२ सालच्या दुष्काळात विवाह झाला होता. दुष्काळ असल्याने त्यांचा विवाह हा सध्या पद्धतीने झाला. त्यांनतर या दाम्पत्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून कष्टाने संसार उभा करून आपल्या दोन मुले, दोन मुलींचे शिक्षण करत त्यांचाही संसार उभा करून दिला.आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची जाणीव त्यांच्या चारही मुलांना आहे. यातूनच त्यांनी आई वडिलांच्या ;लग्नाचा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा करायचा ठरवले


अन पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला


आई वडील नेहमी त्यांना त्यांच्या जून्या दिवसांचे धडे देत होते.तसेच समाजामध्ये वावरत असताना होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पाहून आपल्या आई वडिलांचा बाबतीत असा कोणताच आनंदाचा कार्यक्रम कधी झाला नसल्याची सल या चारही भावंडांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी आपल्या आई वडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या थाटात करत आई वडिलांचा पुन्हा विवाह करण्याचा निर्णय अविनाश थोरवे, अतुल थोरवे, वैशाली आदक, अर्चना येन्धे या चारही मुलांनी घेतला. आणि वऱ्हाडीमंडळी सह मोठ्या थाटात हा विवाह समारंभ पार पडला

आई – वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला

पुन्हा एकदा आई-वडिलांचा वाजत गाजत विवाह सोहळा साजरा केला.साखरपुडा,हळदी समारंभ ते थेट बिदाई असा अनोखा कार्यक्रम केला मोठी वरात ही काढण्यात आली यावेळेस आई वडिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला या लग्न समारंभानंतर संपूर्ण थोरवे कुटुंब भाउक झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र मुलांनी एवढ्या मोठ्या उत्साहात पुन्हा विवाह सोहळा साजरा केल्याने आईला व वडिलांना एक अनोखी भेट दिली असल्याचे आई माणिकबाई यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांची मुले, मुली, नातू पाहुणे मित्र मंडळ मोठ्या संख्येने हजेरी लावली खरी..मात्र थोरवे कुटुंबीयांचा हा आनंद पाहून आपल्याही आई वडिलांना असा आनंद देण्याचा मोह कुणालाच आवरणार नाही हे मात्र तितकेच खरे.

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.