Skip to main content

650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी केली जप्त, डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु

पुणे प्रतिनिधी: 

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी जप्त केली आहेत. तर राज्य परीक्षा परीषदेकडे बोगस प्रमाणपत्राबाबत 45 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा राज्य परीक्षा परिषदेला मिळाला आहे. आतापर्यंत 2019-20 च्या परिक्षेतली 400 तर 2018 च्या परीक्षेमध्ये पास झाल्याचे दाखवून 250 बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. जी ए सॉफ्टवेअर कडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

स्वतंत्र गुन्हे दाखल

2018 च्या टीईटी परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केलाच तपासात उघड झाले आहे. 2018 2019-20 अशा दोन्ही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यात स्वतंत्र गुन्हे पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहेत. 2018 च्या गुन्ह्या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखीन 12 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये 2018 च्या परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

आरोपींकडे चौकशी सुरूच

या घोटाळ्यात ज्या अपात्र उमेदवारांनी पात्र होत दलालांना पैसे दिले आहेत . त्यांनी स्वतः होऊन पुढं येत माफीचा साक्षीदार व्हावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यातून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. चौकशी दरम्यान एका आरोपी या घोटाळ्याची पाळंमुळं बिहार पाटण्यापर्यंत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या काही तास प्रश्‍नपत्रिका सर्व्हरवर डाऊनलोड करतात. गैरप्रकार करणारे सर्व्हरच्या गोपनीय क्रमांकात छेडछाड करून प्रश्‍नपत्रिका फोडतात. परीक्षा केंद्रावरील संगणकात छेडछाड करून गैरप्रकार केले जातात. असे तपासादरम्यान समोर आले आहे.

  

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.