Skip to main content

सत्कर्म फाउंडेशन आणि समर्थ भारत परिवाराच्या वतीने वाफगावच्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस चे वितरण.

प्रतिनिधी- वाफगाव



 वाफगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे 115 विद्यार्थ्यांना मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर आणि शालेय समिती अध्यक्ष  सोनाली सोमनाथ वाफगावकर यांचे विशेष प्रयत्नातून सत-कर्म फाउंडेशन मुंबई व समर्थ भारत परिवार यांच्या वतीने स्पोर्ट ड्रेस (गणवेश) वितरण करण्यात आले. शाळा बंद असल्याने काही ठराविक विद्यार्थ्यांना बोलवून गणवेश वाटप करण्यात आले. सत-कर्म फाऊंडेशन मुंबई व समर्थ भारत परिवार आंबेगांव यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला सत्कर्म फाउंडेशनचे संचालक  अनुज एन. नरुला, अँडव्होकेट हायकोर्ट मुंबई. दत्तात्रय डी.सावंत, डॉ. समीर पठाण सर (प्रदेश अध्यक्ष, राज्य पत्रकार महासंघ), डाँ.ओमप्रकाश गजरे सर, एम.डी.मुलाणी सर,भानुदास बो-हाडे सर, डॉ.हनुमंत भवारी सर, अदित्य चव्हाण सर, तारामती भागीत, सुवर्णा तांबे  मुख्याध्यापक,वाफगाव.,मा.मुख्याध्यापक घंगाळदरे हुले सर. घाटकोपर मुंबई हनुमंत टाव्हरे, समाजसुधारक मेंगडे सरमुंबई,जिजाराम सोळसे सर,  स्नेहा बारवे कार्यकारी संपादिका समर्थ भारत) वाफगाव प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनालीताई वाफगांवकर, उपाध्यक्ष गणेश सुर्वे पाटील व सर्व सदस्य त्याचप्रमाणे ज्याच्या माध्यमातून सर्व शक्य झाले ते मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर  तसेच गावातील सरपंच उमेश रामाणे, सरपंच राजेंद्र टाकळकर,तसेच गावातील सर्व ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते

 त्यानंतर दत्तात्रय सावंत सर, मुलाणी सर, सांडभोर गुरूजी, तसेच बाळपाटील सुर्वे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच विदयालयाचे रामदास येवले सर यांनी उपस्थितांचे तसेच सत्कर्म फाउंडेशन आणि समर्थ भारत परीवाराचे आभार मानले त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.