Skip to main content

राज्याच्या शिक्षण विभागात विसंवाद? ; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मंत्र्यांमध्येच परस्परविरोधी मते

प्रतिनिधी:पुणे

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री, राज्य मंडळ आणि शिक्षण राज्यमंत्री परस्पर विरोधी भूमिका मांडत असल्याने शिक्षण विभागात विसंवाद आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने केली आहे.

राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही राज्य मंडळाने परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याची तयारी केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनीही परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्याची भूमिका मांडली आहे. मात्र शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. त्यामुळे पालक, विद्यार्थी, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने राज्य मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन देऊन परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्याची मागणी केली आहे. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने अध्यापन करून पूर्ण करण्यात आला आहे. चाचणी परीक्षा, सत्र परीक्षाही झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लेखन कमी झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत वेळ वाढवून देण्याची घोषणाही आधीच करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि उजळणीसाठी महिन्यभराचा कालावधी आहे. अचानक मूल्यमापन पद्धतीत बदल करणे चुकीचे आहे, परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्यास राज्याच्या काही भागातील कडक उन्हाळा, काही भागातील अवकाळी पावसाची शक्यता विचारात घेतली पाहिजे.त्यामुळे परीक्षा वेळापत्रकानुसारच घ्याव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.