Skip to main content

तोंडात बोळा, डोळ्यावर पट्टी, हात-पाय बांधून बेदम मारहाण, धावत्या वाहनातून तलावात फेकलं, जालन्यात थरारक अपहरण!!

प्रतिनिधी:समर्थ भारत न्यूज नेटवर्क

तोंडात बोळा कोंबून, हात-पाय बांधून बेदम मारहाण करत एका व्यवसायिकाचे थरारक अपहरण झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. तालुक्यातील मादळमोही येथील व्यावसायिकाचे तीन अज्ञातांनी साठेवाडी फाट्यावरून अपहरण केले. अपहरण केल्यानंतर व्यावसायिकाला भरधाव वाहनात बेदम करण्यात आली. दहा लाख रुपयांची खंडणी दे नाही तर जीवे मारतो, अशी धमकी देण्यात आली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने व्यावसायिकाला धावत्या वाहनातून तलावात फेकून देण्यात आली. त्याची जीपही कालव्यात ढकलून दिली आणि दुसऱ्या वाहनातून अपहरणकर्ते फरार झाले. 26 जानेवारी रोजी ही घटना घडली.

व्यावसायिकानं सांगितली अपबिती
व्यावसायिकावर उपचार सुरु

जालन्यातील कैलास शिंगटे या व्यावसायिकाचे अहरण झाले होते. जेसीबी, पोकलेनचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरून कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावरून येत होते. त्यावेळी साठेवाडीजवळ त्यांच्या दुचाकीला जीपने जोरात धडक दिली. खाली कोसळलेल्या कैलास शिंगटेंना अपहरणकर्त्यांनी उचलून जीपमध्ये टाकले. यानंतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधले. डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण करत तब्बल दहा लाखांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना दाभणाने जखमी केले. मात्र रस्त्यातच जीपचे डिझेल संपल्याने अंतरवाली सराटी शिवाराजवळील कालव्यात त्यांनी जीप ढकलून दिली. त्यानंतर दुसरी गाडी बोलावून अपहरणकर्ते फरार झाले. औरंगाबाद-सोलापूर मार्गावरील सौंदलगाव शिवारात कैलास शिंगटे यांना गाडीतून खाली फेकून दिले.

त्यानंतर कैलास यांनी जवळच्या हॉटेलवर येऊन घरी फोन करून घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी कैलास शिंगटे यांच्यावर वडीगोद्री येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. त्यानंतर कुटुंबीय पोहोचले. शिंगटे यांनी गोंदी ठाण्यात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा चकलांबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. अपहरणकर्ते कोण आहेत, पैशांशिवाय त्यांचा इतर काही हेतू होता का, या सर्व प्रश्नांचा तपास पोलीस करत आहेत.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.