Skip to main content

लाँड्रीचालकाला महाराष्ट्राचा सॅल्यूट, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परत करणारा ‘माणूस’ झाला श्रीमंत!

 प्रतिनिधी:पुणे

राज्यात रोज खून, दरोडा, चोरीच्या घटना घडतात. दागिन्यांची चोरी होण्याचे प्रमाण तर बरेच आहे. चुकून एखादा दागिना हरवला तर तो परत मिळण्याची शक्यता धुसरच असते. आपल्या आजूबाजूला आजकाल प्रामाणिक लोकांची संख्या फार कमी झाली आहे. अशा परिस्थितीत आपली नितीमत्ता ढळू न देणाऱ्या एका माणासाचे उदाहण समोर आले आहे. पुण्यातील व्यंकटेश सोसायटीमधील राजकमल कनोजिया यांनी तब्बल सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने परत केले आहेत. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असे दागिने सुखरुप ठेवले आणि मालकाला ते परत केले आहेत. विशेष म्हणजे राजकमल कनोजिया हे अमराठी असून ते लॉन्ड्रीचालक आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यातील व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया यांनी रविवारी इस्त्रीसाठी आपले कपडे शुभलक्ष्मी ड्रायक्लिनर्समध्ये दिले होते. त्यानंतर मंगळवारी हे कपडे इस्त्री करताना राजमल कनोजिया यांना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला इस्त्री केल्यानंतर राजकमल कनोजिया यांनी सोन्याचे दागिने अशोक कनोजिया यांच्या घरी नेऊन दिले. याआधी सोन्याचे दागिने मिळत नसल्यामुळे अशोक कनोजिया हतबल झाले होते. तब्बल सहा लाख रुपयांचे दागिने हरवल्यामुळे त्यांची झोप उडाली होती. मात्र ड्रायक्लिनर राजकमल अनोजिया यांनी अशोक कनोजिया यांना कपड्यासह त्यांचे सोन्याचे दागिने परत दिले. आपले दागिने परत भेटल्यामुळे अशोक कनोजिया यांचा जीव भांड्यात पडला आहे.

राजकमल कनोजिया यांचा केला सत्कार 

दरम्यान, दागिने परत मिळाल्यानंतर अशोक कनोजिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घरात लग्नकार्य असल्याने घरी बहीण आली होती. तिचे दागिने माझ्या खिशामध्ये ठेवले होते. मात्र, ते सापडत नसल्याने मागिल आठवड्यापासून आम्ही शोधत होतो, असे अशोक कनोजिया यांनी सांगितलं. दागिने परत मिळाल्यामुळे ड्रायक्लिनर राजकमल कनोजिया यांचे अशोक कनोजिया यांनी आभार मानले आहेत. राजकमल कनोजिया यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतूक केले जात आहे. राजकमल कनोजिया यांचा व्यंकटेश सोसयाटीमध्ये प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्यात आलाय.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.