Skip to main content

गोळेगाव येथील ग्रामस्थ करतात आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजसेवा

प्रतिनिधी : दत्ता नेटके 

गोळेगाव तालुका जुन्नर येथील गावातील काही सामाजिक कार्यकर्ते गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने सामाजिक कार्य करत असून त्यांच्या सामाजिक कार्याची सर्व गावकरी कौतुक करत आहेत.   गोळेगाव गावातील माजी सरपंच केशव जगन्नाथ बिडवई. विश्वनाथ लोखंडे, गोपाळ वानी, सदाशिव ताम्हणे, शंकर ताम्हाणे, आर्यन बिडवई, हे ग्रामस्थ गावातील कुठलीही व्यक्ती मयत झाल्यास त्यामयत व्यक्तिच्या कुटूंबाला अंत्यविधी साठी लागणारे महत्त्वाचे लागणारे सामानाचा खर्च तसेच दशक्रिया विधी चा खर्च हे सर्वजण मिळून करत असतात. गावात एखादि व्यक्ती मयत झाल्यास त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतो त्या वेळी या दुःखाकित कुटुंबाच्या मदतीला धावून जात त्या कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीचा साठी लागणारे सर्व साहित्य किराणा हा स्वखर्चातून घेऊन येतात तसेच दशक्रिया विधीसाठी त्या कुटुंबाकडे खर्चासाठी पैसा नसेल तर तो खर्च देखील त्यांच्या माध्यमातून केला जातो. मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी पासून ते तेराव्या पर्यंतचा खर्च हे व्यक्ती उचलत असतात नंतर त्या कुटुंबातील व्यक्तीकडे पैसे आल्यानंतर ते पैसे ते घेत असतात.

 गेल्या अनेक वर्षांपासून ते हे सामाजिक कार्य करत असून या सामाजिक कामाचे सर्व गावकरी कौतुक करत आहेत.  या आगळ्यावेगळ्या सामाजिक कामामुळे आमची भरभराट झाली असून आम्हाला कुठलीही अडचण येत नाही असे माजी सरपंच केशव बिडवई सांगतात तसेच तालुक्यातील इतर  गावातील समाजसेवेचे आवड असलेल्या ग्रामस्थ व तरुणांनीही आपापल्या गावात या प्रकारे गरजूंना मदत करावी असे आवाहन या सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.