Skip to main content

आहुपे गावात 'सरपंच चषक' या भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

घोडेगाव प्रतिनिधी:

अनिल नटू भोईर व रमेश लोहकरे सरपंच यांच्या सौजन्यांने,आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी आहुपे खोऱ्यातील आहुपे गावात 'सरपंच चषक' या भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकवन्या संघाला भरघोस बक्षिस देखील ठेवण्यात आले होते.

प्रथम् क्रमांक:- ४४,४४४

व्दितीय क्रमांक:- ३३,३३३

तृतीय क्रमांक:-२२,२२२

चतुर्थ क्रमांक:-११,१११

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोव्हीड चे सर्व नियम पाळून, जास्तीत जास्त संघानी आपला सहभाग नोंदवला. ही स्पर्धा १९ जानेवारी ते रविवार २३ जानेवारी या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेमध्ये  एकुन ४० संघानी आपला सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळीने खेळाडूंने प्रक्षेकांची मने जिकंली.

या पैंकी ज्या चार संघानी सर्वोत्कृष्ट खेळ केला,ते संघ नंबर दाखल सेमी फायन मध्ये जाऊन पोहचले,२३ जानेवारी रोजी 'केडे पाटील' मैदानावर टेनिस क्रिकेटचा फायनलचा थरार रंगला.

सर्वोत्कृ खेळ केल्याने खालील संघाने आपले नाव सरपंच चषकावरती कोरले.

 १) प्रथम् क्रमांक:- लायन हार्टेड ११ जांभोरी या संघाने ४४,४४४ रूपये भव्य चषक मिळवून प्रथम क्रमांक पटकविला. या संघाचे संघ मालक मनोहर केंगले गुरूजी, सुरज प्रकाशराव घोलप याचे सहकार्ये मोलाचे राहिले.

२) व्दितीय क्रमांक:- काळभैरव क्रिकेट क्लब आहुपे.३३,३३३ रूपये भव्य चषक मिळविला.

३) तृतीय क्रमांक:- मुरबाड तालुक्यातील खपाचीवाडी यांनी२२,२२२ रूपये भव्य चषक मिळविला.

४)चतुर्थ क्रमांक:- तेरूंण क्रिकेट क्लब संघाने ११,१११ रूपये भव्य चषक पटकविला.

जांभोरी गावचे पोलीस पाटील श्री. नवनाथ दत्तात्रय केंगले, सरपंच विलास केंगले, अशोक पेकारी (सामाजिक कार्यकर्ते ), लक्ष्मण मावळे. मारुतीदादा केंगले युवानेते यांचे जांभोरी टीमच्या मागे खूप मोठे मोलाचे सहकार्य आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.