Skip to main content

आम्हाला 50 हजारांची मदत कधी मिळणार?; नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचा प्रश्न

प्रतिनिधी:समर्थ भारत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला. स्मशानातंही दिवसभराची वेटिंग, अशी नागपूरची अवस्था होती. उपचारासाठी लाखो रुपये खर्च करुन लोक हवालदिल झाले. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 189 कोरोना मृत्यूची नोंद झालीय. या परिवाराला सरकारी 50 हजारांच्या मदतीची अपेक्षा होती. पण जिल्ह्यातील तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत. त्यापैकीच एक आहे नागपुरातील सौरभ ठुसे परिवार. नागपुरात दिघोरी परिसरात राहणारे तुळशीराम ठुसे यांना दुसऱ्या लाटेत कोरोनाने गाठलं. दोन-तीन दिवस घरी उपचार केले. रुग्णालयात बेड मिळत नव्हता. कसाबसा बेड मिळाला. उपचारावर तीन लाख खर्च केले. पण जीव वाचला नाही. आता त्यांच्या पेन्शनवर घर चालतंय. सरकारने 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली, त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. तीन डिसेंबर 2021 ला त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी अर्ज केला. पण अद्याप मदत मिळाली नाही, अशी माहिती सुनीता तुळशीराम ठुसे यांनी दिली.

तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट

तुळशीराम ठुसे यांचा मुलगा 27 वर्षांचा आहे. कोरोनात त्याचीही नोकरी गेली. आधार होईल म्हणून त्यांनी 50 हजार रुपयांच्या मदतीसाठी ऑनलाईन अर्ज केला. इतरांना 10-15 दिवसांत मदत मिळाली. पण दोन महिने लोटत आले तरिही सौरभ यांचा अर्ज पुढे सरकला नाही. सरकारी कार्यालयात जावं तर नीट उत्तरंही त्यांना मिळत नाही, अशी माहिती सौरभ ठुसे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात सरकारी आकड्यानुसार 10 हजार 189 कोरोना मृत्यूची नोंद आहे. पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मदतीसाठी 15 हजारांपेक्षा जास्त अर्ज आलेत. यापैकी 10 हजारांपेक्षा जास्त जणांना मदत मिळाल्याचं अधिकारी सांगतात. तीन हजार पेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत.

अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे

नागपूर जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत. रुग्णालयाकडून कोविड मृत्यूचं प्रमाणपत्र मिळत नाही. कोविड मृत्यूचं प्रमाणपत्र नसल्याने 80 टक्के अर्ज रद्द झालेत. अर्जासोबत आधारकार्ड नसणे, बॅंक खात्याची नीट माहिती न देणे, परराज्य किंवा इतर जिल्ह्यातील रहिवासी अशी कारण यामागे आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात सरकारी माहितीनुसार आतापर्यंत 10 हजार 189 कोवीड मृत्यूची नोंद आहे. पण 50 हजार रुपयांच्या मदतीसाठी आलेले 15 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीपेक्षा कोरोनाने कितीतरीपट जास्त मृत्यू झाले, हे वास्तव नाकारता येण्यासारखं नक्कीच नाही.

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.