Skip to main content

ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव माजी विद्यार्थी 1980-81 दहावी बॅचचा स्नेह मेळावा संपन्न

प्रतिनिधी:रामकृष्ण भागवत


  

श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव माजी विद्यार्थी 1980 81 विद्या विद्या चा स्नेहमेळावा रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी मातोश्री मंगल कार्यालय सावरगाव याठिकाणी संपन्न झाला सर्व विद्यार्थी चाळीस वर्षांनी एकमेकांना भेटल्यामुळे प्रत्येकाला भरपूर आनंद झाला प्रत्येकाने आपल्या मनातील भावना प्रगट केल्या यामध्ये शाळेविषयी असलेली आस्था आणि गुरूजन विषय असलेले प्रेम सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आपण सर्वजण चाळीस वर्षांनी एकत्रितपणे आपला ग्रुप तयार झाला आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुख दुःखा मध्ये सहभागी व्हायचा आहे आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण नेहमीच मदतीला धावून जायचे आहे असेही भाव त्या ठिकाणी प्रगट केले याप्रसंगी गुरुवर्य मेहर बाई आणि कुटे सर उपस्थित होते यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला अशोक बाबुलनाथ बाळसराफ ,अशोक शांताराम बाळसराफ ,दत्तात्रेय लोखंडे ,विकास जुंदरे,रमेश शेलार ,सावकार गाढवे, निवृत्ती बाळसराफ ,रवींद्र शिरसागर, ज्ञानेश्वर वाबळे, एकनाथ बाळसराफ, जालिंदर तांबोळी, दादाभाऊ तांबोळी, खंडेराव शिंदे ,प्रकाश थोरात ,काशिनाथ कचरे ,बबन दातखिळे ,मधुकर मनसुख, ज्ञानेश्वर गाढवे ,सुवर्णा खराडे ,कल्पना घोलप ,रंजना बोराडे ,सुरेखा हांडे, मंदा ढोबळे ,मालिनी घोलप ,माणिक वाणी, मारुती जाधव, ज्ञानेश्वर गोरडे ,अविनाश मेहेर, पांडुरंग जुंदरे, शिवाजी वाणी रामदास खांडगे, भरत वाबळे ,हरिभाऊ गाढवे हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती बाळसराफ अशोक बाबुलनाथ बाळसराफ अशोक शांताराम बाळसराफ आणि सुरेखा हांडे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदन रामकृष्ण भागवत यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार सुरेखा हांडे यांनी मानले.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.