Skip to main content

मंत्रीमंडळाच्या निर्णयाची होईना अंमलबजावणी, आधिकाऱ्यांवर अजितदादा वैतागले

पुणे प्रतिनिधी:



कोरोना काळात सरळ सेवा भरती व सयुंक्त पूर्व परीक्षांसाठी वयोमर्यादेतील वाढ तसेच ४१६ उमेदवारांच्या अंतीम नियुक्त्यांच्या विषयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांना फैलावर घेतले. वयोमर्यादेच्या सवलतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असे पवार यांनी बजावले आहे.

कोरोना काळात सरळ सेवा भरती व सयुंक्त पूर्व परीक्षा न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली होती. त्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एका वर्षाच्या सवलतीचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला होता. त्याचबरोबर ४१६ उमेदवारांची निवड होऊनही नियुक्ती राखडल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी. मंत्रिमंडळाच्या या दोन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार व सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले.

कॅबिनेटच्या बैठकीदरम्यान विभागाच्या प्रधान सचिव सचिव सुजाता सौनिक यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावर अद्याप अंमलबजावणी न झाल्याने उपमुख्यमंत्र्यांनी अंमलबजावणी का झाली नाही, असा जाब विचारत तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान, पुढील वर्षी २६ फेब्रुवारीला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खात्री मी देतो असे अश्‍वासन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री भरणे यांनी दिले.

४१६ नियुक्तीच्या संदर्भात व वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष वाढीचा निर्णय घेऊन महिना उलटला तरी या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती .यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा पवार व भरणे यांच्या भेटी घेतल्या होत्या . या मागणीबाबत विद्यार्थ्यांचा रेटा पाहून पवार आणि भरणे यांनी वेळोवेळी प्रशासनाला लवकर अंमलबजावणी करावी याचे आदेश दिले होते. मात्र, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उदासीनतेमुळे या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

कोरोना व मराठा आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा, तसेच सरळसेवेची भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. या काळात परीक्षेची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांची सवलत मागितली होती. मात्र, एका वर्षाच्या सवलतीचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. मात्र, त्याची अद्याप झाली अंमलबजावणी नसल्याने विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी’च्या परीक्षांसाठी अर्ज करता येत नाही. यामुळे वयोमर्यादा सवलतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी विद्यार्थी वर्गाने केली आहे.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.