Skip to main content

महाराष्ट्र सुधारण्यासाठी बालविवाह रोखणे गरजेचे- रुपाली चाकणकर

तळेगाव ढमढेरे : प्रतिनिधी



महाराष्ट्र सुधारण्यासाठी बालविवाह रोखणे काळाची गरज असून, त्यासाठी लोकप्रतिनिधीसह समाजाचीही जबाबदारी आहे. महिलांवरील अन्याय व अत्याचार याविरुद्ध आमचा लढा असून, महिलांना आत्मसन्मान मिळवून देणे ही महिला आयोगाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभात चाकणकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिरूर- हवेलीचे आमदार ऍड.अशोक पवार होते. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येथील श्रीसंत सावता महाराज मंगल कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्थांतर्फे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चाकणकर पुढे म्हणाल्या की, राज्य महिला आयोगामार्फत आदिवासी महिलांसह सर्व स्तरातील महिलांना न्याय दिला जाईल. महिलांवरील अन्यायाविरुद्ध आमचा लढा राहील. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. बालविवाह रोखणे ही सामाजिक जबाबदारी आहे. वंशाच्या दिव्यासाठी मुलींची हत्त्या करू नका. आमचा लढा समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा व प्रथा याविरुद्ध आहे. महिलांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.आगामी तीन वर्षाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणार आहे. राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील महिला दक्षता कमिटी कार्यरत करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. महिलांवर अन्याय व अत्याचार होत असेल तर ग्रामीण भागासाठी ११२ आणि शहरी भागासाठी १०९१ या हेल्पलाइनवर कळवील्यास तातडीने पोलिसांकडून सेवा मिळेल असे चाकणकर सांगितले. तळेगाव ढमढेरे पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या सत्कारामुळे जबाबदारी वाढली असून, महिला आयोग सर्व महिलांना आपला व माहेरचा वाटेल असे काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार अशोक पवार म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांनी दिलेली समतेची शिकवण समाजाला मिळालेली शिदोरी आहे.महिलांचे अनेक प्रश्न असून आयोगामार्फत तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. महिलांच्या तक्रारींची ऍपद्वारे नोंदणी करावी. रुपाली चाकणकर यांना फार कमी वयात हे पद मिळाले असून त्यांनी केलेले कार्य व सांभाळलेल्या जबाबदारीची धुरा जनमानसात रुजल्याने हे पद देऊन महिलांचा सन्मान वाढविला असल्याचे ऍड पवार यांनी सांगितले.यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष विद्या भुजबळ, प्रा.शितल नरके यांची भाषणे झाली.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, दूध संघाचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ढमढेरे, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, डॉ. वर्षा शिवले, बाजार समितीचे सभापती काकासाहेब कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, अनिल भुजबळ व विकासआबा शिवले, संतोष रणदिवे, माजी सभापती शंकर जांभळकर, घोडगंगा कारखान्याचे संचालक पोपटभाऊ भुजबळ व बाळासाहेब ढमढेरे, काँग्रेसचे जिल्हा खजिनदार महेशबापू ढमढेरे, ज्येष्ठ नेते श्रीकांत सातपुते, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, रामेशदादा भुजबळ, खरेदी विक्री संघाचे संचालक संभाजी भुजबळ व शहाजी ढमढेरे, सरचिटणीस सुनील ढमढेरे, ऍड सुरेश भुजबळ, विविध राजकीय पक्षांचे आजी- माजी पदाधिकारी, विविध संघटना, शिक्षणसंस्था व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.