Skip to main content

सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक

आळंदी प्रतिनिधी:

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सव्वासातशे वर्षांनंतर माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्यपालांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

''पुज्य ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाच्या दर्शनाचा लाभ झाल्याने धन्य झालो. माऊलींनी चराचरातील लहानमोठ्यांना आईचे ममत्व दाखवले आहे. त्यामुळे आजही त्यांनी केलेला उपदेश समाजात प्रेरक आहे. माऊलींना प्रार्थना करतो की, आपले छत्र संपुर्ण विश्वातील प्राणीमात्रावर असावे. जेणेकरुन माऊलींच्या विचारांवर भागवतधर्म सन्मानाने चालत राहिल असा विचार कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.''

त्यानंतर वीणामंडपात सुरू असलेल्या कीर्तनात वीणा गळयात घेऊन त्यांनी माऊलींचा गजर केला. देवस्थानच्या वतीने माऊलींची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ॲड. विकास ढगे - पाटील, आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, उपायुक्त प्रेरणा कट्टे, तहसीलदार वैशाली वाघमारे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, स्वप्नील निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.