Skip to main content

शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

पुणे प्रतिनिधी:

राज्यातील शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असली तरी शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यावर कोणती काळजी घ्यावी याबाबतची सविस्तर नियमावली आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोना विषयक नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी शाळा, विद्यार्थी, शिक्षकसर्वांनीच घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.

कन्टेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करू नयेत.तसेच कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास अनुमती देऊ नये. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करून घ्यावी. शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पध्दत टाळावी. शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेऊन शाळेत मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करावी. शक्यतो शाळेत गर्दी होणारे खेळ सामूहिक प्रार्थना असे उपक्रम टाळावेत. शाळेतील जलतरण तलाव सुरू करू नयेत. सर्वांनी फेसमास्क, फेस कव्हर, हॅन्ड सॅनिटायझर यांचा पुरेसा साठा ठेवावा.

कोरोना विषयक लक्षणे असणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी देऊ नये.शाळेत दर्शनी भागात कोरोना प्रतिबंधक संदर्भातील आरोग्य शिक्षण विषयक साहित्य लावावे.स्कूल बस मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहनात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आजारी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेत येऊ नये. विद्यार्थी व शिक्षकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे शाळेत कोणालाही कोरोना विषयक लक्षणे अढळल्यास कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबतची सविस्तर नियमावली आरोग्य विभागाने प्रसिध्द केली आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.