Skip to main content

पिकअपने दिलेल्या धडकेत मेंढपाळाच्या १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मंचर प्रतिनिधी:

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एकलहरे (ता. आंबेगाव) येथील मेंढपाळाच्या १४ वर्षीय मुलाला पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन या मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद वडील नामदेव रामा सूळ ( वय 50 मूळ राहणार वडगाव सावता ता. पारनेर जि. अहमदनगर ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मेंढपाळ नामदेव सूळ हे मेंढपाळ असून कुटूंबासह गेल्या अनेक वर्षांपासून एकलहरे येथे शेतामध्ये राहत आहे. दि. २८/११/२१ रोजी त्यांचा मुलगा खंडू व ते स्वतःहा पुणे-नाशिक रस्ता ओलांडून मेंढ्यांना चारा आणण्यासाठी जात असताना. त्यांचा मुलगा खंडू नामदेव सुळ वय १४ हा सायकल वरून हायवे रस्ता ओलांडत असताना त्याला  भरधाव आलेल्या पिकअप गाडी एम. एच १२ एल. टी.४८०९ या वाहनाने धडक दिली. यात चार ते पाच मीटर त्याला फरपटत नेले. पिकअप चालक गाडीसह पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. खंडूला रुग्णवाहिकेत द्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टर यांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. खंडू सुळ याच्या मागे आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. 

याबाबत पोलिस ठाण्यात पिकअप चालक विकास रामदास साबळे ( रा.येवलेवाडी कोंढवा बुद्रुक पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार नाडेकर करत आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.