Skip to main content

पुण्याचा विकास भाजपमुळे खोळंबला महाविकास आघाडीचा आरोप

पुणे : प्रतिनिधी 

भाजप राज्य सरकारमध्ये असताना भामा आसखेड, समान पाणी पुरवठा योजना, रिंग रोड, विमानतळ यासह अनेक प्रकल्प रखडले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्वच प्रकल्पांना गती मिळाली आहे. आगामी काळात आम्ही पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असा दावा महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्‍याम देशपांडे यावेळी उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुण्याच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २६ हजार कोटीचा रिंग रोड तयार केला जाणार आहे, त्याचे ९० टक्के भूसंपादन झाले आहे. यासह अनेक कामे या सरकारने केली. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भाजपने भडकावल्याने त्यांनी आत्महत्या केल्या.देशपांडे म्हणाले, ‘‘ महाविकास आघाडी सरकार एकत्रित प्रयत्नांमधून काम करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समाजकारणाचा वसा उद्धव चालवत आहेत. सकारात्मक, कृतीवर भर देणारे सरकार आहे.’’‘‘महाविकास आघाडी सरकार पडणार असे रोज भाजपचे नेते सांगत आहेत. हा भाजप म्हणजे भारतीय ज्योतिष पक्ष झाला आहे. आमचे सरकार स्थिर असून, पूर्णकाळ टिकेल. उलट भाजपने कोरोना काळात लसीकरणासह इतर गोष्टीत पक्षपाती राजकारण केले आहे, असा आरोप काकडे यांनी केला.काँग्रेस अनुपस्थितशहरात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत जवळीक तर काँग्रेससोबत दुरावा निर्माण झाला आहे. एटीएमएसच्या विषयाला मुख्यसभेत भाजपला साथ दिल्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असूनही काँग्रेसचे शहराध्यक्ष किंवा त्यांचा पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री काँग्रेस भवनात आल्याने रमेश बागवे आले नसल्याचे काकडे यांनी सांगितले.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.