Skip to main content

पुण्याचा विकास भाजपमुळे खोळंबला महाविकास आघाडीचा आरोप

पुणे : प्रतिनिधी 

भाजप राज्य सरकारमध्ये असताना भामा आसखेड, समान पाणी पुरवठा योजना, रिंग रोड, विमानतळ यासह अनेक प्रकल्प रखडले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्वच प्रकल्पांना गती मिळाली आहे. आगामी काळात आम्ही पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असा दावा महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्‍याम देशपांडे यावेळी उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुण्याच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २६ हजार कोटीचा रिंग रोड तयार केला जाणार आहे, त्याचे ९० टक्के भूसंपादन झाले आहे. यासह अनेक कामे या सरकारने केली. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भाजपने भडकावल्याने त्यांनी आत्महत्या केल्या.देशपांडे म्हणाले, ‘‘ महाविकास आघाडी सरकार एकत्रित प्रयत्नांमधून काम करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समाजकारणाचा वसा उद्धव चालवत आहेत. सकारात्मक, कृतीवर भर देणारे सरकार आहे.’’‘‘महाविकास आघाडी सरकार पडणार असे रोज भाजपचे नेते सांगत आहेत. हा भाजप म्हणजे भारतीय ज्योतिष पक्ष झाला आहे. आमचे सरकार स्थिर असून, पूर्णकाळ टिकेल. उलट भाजपने कोरोना काळात लसीकरणासह इतर गोष्टीत पक्षपाती राजकारण केले आहे, असा आरोप काकडे यांनी केला.काँग्रेस अनुपस्थितशहरात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत जवळीक तर काँग्रेससोबत दुरावा निर्माण झाला आहे. एटीएमएसच्या विषयाला मुख्यसभेत भाजपला साथ दिल्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असूनही काँग्रेसचे शहराध्यक्ष किंवा त्यांचा पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री काँग्रेस भवनात आल्याने रमेश बागवे आले नसल्याचे काकडे यांनी सांगितले.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.