Skip to main content

विजतोडल्यामुळे एमएसईबी कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांचे ठिय्या आंदोलन

 इंदापूर प्रतिनिधी:

इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने दि.२७ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या शेतीचे वीजजोड तातडीने जोडावी यासाठी धरणे आंदोलन कडाक्याच्या थंडीत सुरू आहे. रात्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व इतर प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांबरोबर भाकरी, पिठलं व ठेचाखात तेथेच झोप काढत आंदोलनाची व्याप्ती वाढविली. त्यानंतर महावितरण कार्यालय प्रांगणात त्यांनी सर्व शेतकऱ्यांसमवेत ठिय्या आंदोलन सुरू केले.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेली ११ दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला आहे. त्यामुळे भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर सकाळ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत चालू होई पर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहील, असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पाटील व जगदाळे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

दरम्यान, तहसिलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक टी.वय. मुजावर यांच्या उपस्थितीत दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हर्षवर्धन पाटील,आप्पासाहेब जगदाळे व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक अयशस्वी ठरली. यावेळी पाच हफ्ते भरल्याशिवाय वीज सुरू केली जाणार नाही असा पवित्रा वीज वितरण अधिकाऱ्यांनी घेतला तरराज्याचे वीज मंत्री यांच्या तालुक्यास व इंदापूर तालुक्यास वेगळे धोरण का या पाटील यांच्या म्हणण्यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.