Skip to main content

पुणे जिल्ह्यातील गावातला कोरोना होतोय हद्दपार; हॉटस्पॉट गावांची संख्याही घटली

पुणे प्रतिनिधी:

जगात एकीकडे ओमिक्रॉन नामक कोरोनाचा नव्या विषाणू धुमाकूळ घालत आहे. या भीतीमुळे पुन्हा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी एकेकाळी जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला विषाणू आता हळूहळू हद्दपार होत आहे. या आठवड्यात हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा घटली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. हे चित्र दिलासादायक असले तरी विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे आता पुन्हा सतर्क राहावे लागणार आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाने उच्चांक गाठला होता. दुसऱ्या लाटेत मे महिन्यापासून मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली गेली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने दवाखान्यात खाटासुद्धा मिळणे कठीण झाले होते. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने चिंतेत आणखी भर पडली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने यानंतर प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर प्राधान्याने भर दिल्याने कोरोना बाधित आटोक्यात आले.

जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने राबविल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले. असे असले तरी ग्रामीण भागात १०पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट गावांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. १०० च्या वर या गावांचा आकडा होता. या गावात प्राधान्याने रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहीम प्रशासनाने आखली. घरोघरी जाऊन संशयितांची तपासणी करण्यात आली. यात अनेक बाधित आढळल्याने त्यांना योग्य उपचार वेळीच मिळाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ८ गावांत १० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यात ११ गावे ही हॉटस्पॉट होती. आंबेगाव तालुक्यात १, हवेली तालुक्यात ४, शिरुर तालुक्यात २, तर दौंड तालुक्यात १ अशा ८ गावात १०पेक्षा जास्त रुग्ण आहेत.

सर्वात जास्त क्रियाशील रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट ग्रामपंचायती

जिल्ह्यात ८ गावांत सर्वाधिक क्रियाशील रुग्ण आहेत. यात वाघोलीत ३८, मांजरी बुद्रुक २४, निमोणे १९, मांडवगण फराटा १८, नऱ्हे १८, वरवंड १४, नांदेड १३, मंचर १२.

७ लाख ३३ हजार ७०७ जणांची नमुना तपासणी

जिल्ह्यात हॉटस्पॉट गावात रुग्णसंख्या आटाेक्यात आणण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत नमुना तपासणी करण्यात आली. त्यानुसार ७ लाख ३३ हजार ७०७ जणांची रुग्णतपासणी करण्यात आली.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.