Skip to main content

किरकोळ वादातून जन्मदात्या बापाचा खून

प्रतिनिधी : राहुरी



गाय चे दूध काढण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यामध्ये मुलाने वयोवृद्ध असलेल्या जन्मदात्या बापाला बांबूने जबरदस्त मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी घडली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले.

या घटनेतील मयत विठ्ठल तुळशीराम हारदे य ७२ वर्षे हे राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे आपल्या कुटूंबासह राहत होते. त्यांचा मुलगा आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे हा शुल्लक कारणावरून नेहमी भांडणे करीत असे. 



काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास यातील आरोपी ज्ञानेश्वर हारदे हा दारु पिवुन घरी आला होता. त्याचे व त्याची पत्नी सविता यांच्यात गाय पिळण्याच्या कारणावरून वाद चालू होते. त्यावेळी त्याचे वडील विठ्ठल तुळशीराम हारदे हे आरोपी ज्ञानेश्वर हारदे यास म्हणाले की, तु नेहमीच दारु पित असतो. आणि शुल्लक कारणावरून भांडण करत असतोस. असे म्हणालेचा त्याला राग आल्याने तो त्याचे वडील विठ्ठल हारदे यांना म्हणाला की, तुम्ही नेहमीच माझ्या कामात अडथळा करतात. आज तुम्हाला संपवुन टाकतो. असे म्हणून जवळच पडलेला बांबू घेवून विठ्ठल तुळशीराम हारदे यांना बांबुने जबरदस्त मारहाण करुन त्यांचा निर्घृण खूण केला. विठ्ठल हारदे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.



घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, निरज बोकील आदिंसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आरोपीला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. सर्जेराव म हिपती हारदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे याच्या विरोधात खुणाच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भागचंद सुर्यवंशी हे करीत आहेत.





पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.