Skip to main content

बालगोपाळ किल्ले बनवण्यात मग्न

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:



दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, मोठी मंडळी खरेदी करण्यात व्यस्त तर महिला साफसफाई, फराळ बनवण्याच्या गडबडीत असतानाच बालगोपाळ किल्ले बनवण्यात मग्न झाले आहेत. आजच्या स्मार्ट युगातील या किल्लेदारांची तोफा, हत्ती, घोडे, मावळे तयार झाले असून घोडेगाव येथील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील कुंभार आळीमध्ये करागिर हजारोंच्या संख्येने किल्ल्यावरील मूर्ती, चित्रे तयार करतात. घोडेगाव व पंचक्रोशीत तयार होणा-या चित्रांना पुणे जिल्हयात मोठया प्रमाणात मागणी असते. रेखीव सुबक आकर्षक तसेच योग्य रंगसंगतीचा वापर करून चित्रे तयार केली जातात. शिवाजी महाराज, मावळे, सैनिक, वाघ, हत्ती, तोफा, उंट, घोडे आदिंचा संच २०० रूपयांना उपलब्ध आहे. तसेच या चित्रांबरोबर देवदेवतांची चित्रे, मुर्ती तयार करण्यात आली आहेत.



दिवाळीची सुरू होताच दगड, माती, मावळे, शिवाजी महाराज यांची जमवाजमव करणारी शाळकरी मुले आता फक्त ग्रामीण भागातच दिसुन येत आहे. तर शहरी भागात मुलांना किल्ले बनविण्याची हौस असली तरी अलीकडे माती उपलब्ध होत नाही. सोसायटीच्या पार्कींगमध्ये मुलांनी चिखलकाम केल्यास भिंतीवरचा रंग जातो. व्हरांडा खराब होतो म्हणून अनेक सभासद आक्षेप घेतात. यावर मार्ग काढण्यासाठी रेडिमेड किल्ले घेत आहे.



ग्रामीण भागामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून किल्ल्यांबाबत जास्तीतजास्त माहिती गोळा करून त्यांना आधुनिक, आकर्षक रूप देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. किल्ल्यांच्या आजुबाजुला हिरवळीसाठी मोहरी पेरण्यासाठी बच्चे कंपनी घरच्यांची मदत घेते. रात्री किल्ला आकर्षक दिसावा म्हणून अनेक बालगोपाळ किल्ल्यावर विदयुत रोषणाई करत आहे.








पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.