Skip to main content

मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कामाची पद्धत नवोदित आमदारांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारी - आमदार अतुल बेनके

 मंचर प्रतिनिधी:



राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे जेव्हा जेव्हा अडचणी उभ्या राहतात. तेव्हा तेव्हा संकटमोचक म्हणून दिलीप वळसे पाटील उभे राहतात. दिलीपराव वळसे पाटील एकमेव मंत्री आहेत की ज्यांना न मागता गृहमंत्रीपद मिळाल्याचे राज्यातील जनतेने पहिले आहे. ते माझे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या कामाची पद्धत आमच्यासारख्या नवोदित आमदारांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारी आहे,” असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर सांगता समारंभ व गरजू मुलांना शालेय साहित्य वाटपप्रसंगी बेनके बोलत होते.  यावेळी मावळ चे लोकप्रिय आमदार सुनिलआण्णा शेळके, पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, नगरसेवक गणेशजी खांडगे, जि.प.सदस्य विवेकदादा वळसे पाटील, पंचायत समिती सभापती संजय गवारी, जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई थोरात, तुळशीताई भोर, पंचायत समिती सदस्या उषाताई कानडे, आशाताई शिंगाडे, ज्येष्ठ नेते  गुलाबशेठ नेहरकर, माजी सभापती सुभाष मोरमारे, संचालक विनायक तांबे, दत्ताशेठ थोरात,मा.सभापती वसंतराव भालेराव, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सुषमाताई शिंदे, युवक अध्यक्ष अंकित जाधव, मंचर शहर अध्यक्ष विश्वास बाणखेले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बेनके म्हणाले की “ऊर्जा खाते अडचणीत होते. भारनियमाने जनता त्रस्त झाली होती, त्यावेळीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्याकडे उर्जा खाते सोपविले होते. उर्जा खात्याची प्रतिमा त्यांनी उंचाविली. त्याप्रमाणेच गृहखात्याचीही कामगिरी समाजाभिमुख करून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धैर्य वाढवण्याचे काम करतील. सलग सात वेळा ते वाढत्या मताधिक्याने आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास केला आहे. वळसे पाटील यांच्या गैरहजेरीतही देवेंद्र शहा व बाळासाहेब बेंडे हे व्यवस्थित नियोजन करून जनतेची कामे करतात. त्यामुळे आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधांमध्ये हा मतदार संघ अग्रेसर आहे.


मंचरजवळ तांबडेमळा गोरक्षनाथ टेकडी परिसरात १२० कोटी रुपये खर्च करून २०० बेडचे हॉस्पिटल दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून लवकरच होणार आहे. आमदार अतुल बेनके यांनी आमदार निधीतून एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी देवेंद्र शहा यांनी केली होती. हा धागा पकडून बेनके म्हणाले “वळसे पाटील यांनी सांगितल्यानंतर आमदार निधीतून एक कोटीच काय मी चार कोटी रुपयेही देईल. कारण, जुन्नर तालुक्यातील रुग्णांना येथे चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.