Skip to main content

कुत्र्याचा पाठलाग करत थेट किचनमध्ये शिरला बिबट्या

कोल्हापूर प्रतिनिधी:







जंगलात आणि शेतात दिसणारा बिबट्या आता थेट घरात दिसायला लागल्यावर तुम्हालाही भिती वाटेल. पण असाच धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये समोर आला आहे. कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या थेट किचनमध्ये शिरला. हे पाहून सगळ्यांनाच घाम फुटला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिलारीनगरजवळ असलेल्या कळसगादे पैकी बांदराई धनगरवाड्यात ही घटना मंगळवारी रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याच्या मागे मागे बिबट्या घरात शिरला. घरतल्या काही लोकांनी हे पाहिलं आणि तातडीने कुटुंबियांना बाहेर काढलं. इतकंच नाहीतर मुख्य दारालाही कडी लावली. याची माहिती लगेच वनखात्याला देण्यात आली. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणला. पण पाऊस, दाट धुक्याचा आधार घेत बिबट्या पसार झाला.
रामु भागु लांबोर यांच्या घरात कुत्र्याचा पाठलाग करत शिरलेल्या बिबट्याने सहा तास नागरिकांचा श्वास रोखून धरला. प्रंसगावधन राखून लांबोर यांनी बाहेर पडून दाराची कडी लावल्याने अनर्थ टळला. कळसगादे पैकी बांद्राईवाडा येथे मंगळवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुर्ण वाढीचा बिबट्या भक्षाच्या शोधात आला. रामु लांबोर यांच्या दारात भाकरी खाणाऱ्या कुत्र्यावर हल्ला करत बिबट्या पाठलाग करत सरळ जेवण खोलीत शिरला.
लांबोर यांच्या प्रापंचीक साहित्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. वनक्षेत्रपाल.पी.ए.आवळे वनपाल.बी.आर.भांडकोळी, वनपाल डि.एच.पाटील वनरक्षक डि.एम.बडे, वनमजुर. मोहन तुपारे, तुकाराम गुरव व इतर कर्मचारी उपस्थित होते. रेस्क्यु टीमचे डॉ.वाळवेकर व त्यांची टीम यांनी देखील सदर मोहिम पार पाडण्यास विशेष मेहनत घेतली.

तेथे लांबोर कुटुंबियांनी ओरडा - ओरड केल्यानंतर बिबट्या चुलीवरील तुळईवर चढला. त्यावेळी समय सुचकता दाखवत लांबोर यांनी आपली पत्नी साऊबाई, मुलगी निकिता, मुलगा सुभाष, दोन वर्षाचा मुलगा व विवाहीत मुली - लक्षी व नखलाताई व चार नातवंडे मोठ्या शिताफीने घराबाहेर काढले. घराला बाहेरुन कडी घातली व रहायला शेजारील घरात गेले.

दरम्यान, वनविभागास फोन करून घटनेची माहिती दिली. मुसळधार पाऊस व दाट धुक्यात वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांसह पाहणी केली. घटनेचे गांर्भीय ओळखून वनविभागाने कोल्हापुर येथील डॉ.संतोष वाळवेकर ( पशुधन अधिकारी ) यांच्या रेस्क्यु टीमला पाचारण केले. रेस्क्यु टीम पहाटे चारच्या सुमारास पाटणे येथे दाखल झाली. मात्र, विदयुत पुरवठा खंडीत झाल्याने तसेच मुसळधार पाऊस व दाट धुक्यामुळे सकाळी सहा वाजता स्थानिक ग्रामस्थ आणि रेस्क्यु टीमचे सदस्य व वनविभाग यांनी घटनास्थळी पिंजरा जाळी , दोरखंड व इतर साधन सामुग्रीसह दाखल झाले.

घरमालक लांबोर यांनी पहाटेच्या अंधारात खिडकीचा पत्रा वाकवुन, वाट करुन बिबट निघुन गेलेची शंका व्यक्त केली. मात्र, धोका न पत्करता वनविभागाने एका दरवाजास पिंजरा लावला व मोठयाने आरडा -ओरडा करुन हुसकावले. मात्र, बिबट्याची हालचाल दिसुन आली नाही. त्यानंतर सदर घरात कुत्रे सोडण्यात आले व सभोवतालच्या खिडकी मधुन बॅटरीच्या प्रकाशात संपुर्ण घर शोधले मात्र काहीच सुगावा न लागल्याने अखेर धाडसाने वनविभागाने घरमालकासह आतमध्ये जाऊन खात्री केली असता खिडकी जवळील ओरखडे, विसखटलेले साहित्य, उचकटलेले खिडकीचे रिलींग तसेच तेथे बिबट्याचे लागलेले व पडलेले केस यावरुन बिबट्या पहाटेचा अंधार, पाऊस, धुक्याचा फायदा घेऊन मुळ अधिवासात निघुन गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

 



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.