Skip to main content

संजय जगतापांना साध्या गोष्टीसाठी सुद्धा इतरांचे उंबरे झिजवावे लागताहेत

पुरंदर प्रतिनिधी:







पुरंदर तालुक्यातील बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटातील गावागावांत आपण अवघ्या १९ टक्के रकमेतून शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी दिले. त्यामुळे अवघ्या काही वर्षांपूर्वी ओसाड असलेल्या या भागात आज हजारो एकर ऊस पाहायला मिळतोय.
गावे सुधारली, तरीदेखील या भागातून आपल्याला समाधानकारक मतदान झाले नाही. आज मात्र संपूर्ण पुरंदर तालुका पश्चात्ताप व्यक्त करीत आहे. साध्या साध्या गोष्टीलासुद्धा आपल्या लोकप्रतिनिधीला इतरांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. हा त्रास आपणच स्वतःला करवून घेतला आहे, अशी खंत माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली.

पिसर्वे (ता. पुरंदर) येथील कार्यक्रमात माजी मंत्री शिवतारे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, युवा सेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप, उमेश गायकवाड, रमेश इंगळे, माणिक निंबाळकर, गणेश मुळीक, सागर मोकाशी, सरपंच बाळासाहेब कोलते, रवींद्र कोलते, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मी भगवा हाती घेतला, तेव्हा पुरंदर तालुक्यातील साधा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा माझ्यासोबत नव्हता. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे दिग्गज नेत्यांची फौज होती. राजकारणात काडीचंही स्थान नसलेल्या सामान्य पोरांनी शिवसेनेला घराघरांत पोचवलं आणि २००९ ला तालुक्यात भगवा फडकवला, असे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या शिवसेनेतील राजकीय प्रवासाबाबत सांगितले.
ज्यांना समाजकार्याची आवड आहे

त्यांनी पुढे यावे, अशा इच्छुकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विजय शिवतारे यांनी करून नवीन युवकांना शिवसेना, युवासेना, विद्यार्थीसेना अशा संघटनांमध्ये, व महिलांना महिला आघाडी आणि युवती सेनेमध्ये विविध पदांवर सामावून घेणार असल्याचे शिवतारे यांनी जाहीर केले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.