Skip to main content

कान्हूर मेसाईमध्ये तब्बल 103 दिवसांपासून शाळा सुरु

शिरूर प्रतिनिधी:






शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गेल्या १०३ दिवसांपासून ऑफलाईन पद्धतीने सुरू असून, कोरोनाला शाळेबाहेर ठेवण्यात विद्यालयाला यश आले आहे.
सध्या विद्यालयात घटक संच चाचणी परीक्षा सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयोजन करून परीक्षा पार पडत आहे. प्रत्यक्ष शिक्षण मिळाल्यामुळे परीक्षेच्या काळातही विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पण ह्या विद्यालयात ग्रामस्थ व शिक्षकांच्या पुढाकाराने यावर्षी ही शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात यश आले आहे. प्रत्यक्ष शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये एक भावनिक अतूट नाते निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयात ९८% उपस्थिती असते. यावेळी विद्यार्थ्यांची दररोज आरोग्य तपासणी केली जाते. यापूर्वी पुण्यातील जहाँगिर हॉस्पिटलच्या माध्यमातून दोन वेळा सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे.
विद्यालयाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परिसरातील युवकांसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू केली असून, त्यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांच्यासाठी सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नाट्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. गेल्या १०३ दिवसांत एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसून कोरोनाला शाळेबाहेर ठेवण्यात विद्यालयाला यश आले आहे.

पालकांचा उत्तम प्रतिसाद व शिक्षणाविषयी आस्था असल्याने व शिक्षकही सेवाभावी वृत्तीने काम करत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षा व इतर सर्व परीक्षांचे वर्ग नियमित सुरू आहेत. गोरगरीब, शेतकरी व कष्टकरी पालकांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये यासाठी विद्यालय आटोकाट प्रयत्न करीत असून, त्याला यश येत आहे.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.