Skip to main content

भैरवनाथ विद्यालय शिंगवेतील पाच विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्तीचे मानकरी

शिंगवे प्रतिनिधी:







शिंगवे (ता .आंबेगाव ) येथील भैरवनाथ विद्यालय शिंगवे शाळेतील पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये आल्याने शिंगवे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सानिका अविनाश धरम,ऋतुजा अशोककुमार वाव्हळ, अजित आबाजी वाव्हळ,आकांशा सावन राठोड या सर्व विद्यार्थ्यांनचे व एन एम एम एस शिष्यवृत्ती विभाग प्रमुख नितिन पडवळ, मार्गदर्शक शिक्षक कीरण लायगुडे, सागर वाव्हळ, मंगेश धराडे, यांचे विद्यालयाचे अध्यक्ष, संचालक सरपंच, ग्रामस्थ शिंगवे यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.
आजपर्यंत विद्यालयाचे ८० विद्यार्थी मेरिटमध्ये आले असून त्यांना २५ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती मिळाली आहे.  
ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व पुढील शिक्षणास मदत व्हावी, यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा , नवोदय प्रवेश परीक्षा ,एन.टी.एस परीक्षा  , प्रज्ञाशोध परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यशाची परंपरा या शाळेला लाभली आहे . तसेच क्रीडा स्पर्धा , सांस्कृतिक स्पर्धा , विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहीत्य निर्मिती अशा सहशालेय उपक्रमांमध्येही शिंगवे शाळा तालुक्यात अव्वल असते.
लॉकडाऊनच्या काळातही शिक्षकांनी अभ्यासात खंड पडू न देता विद्यार्थ्यांना आँनलाईन व मळ्यात जाऊन वैयक्तिक मार्गदर्शन केले .          
"एन एम एम एस परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी येण्यासाठी लॉकडाऊन मध्येही मार्गदर्शन सुरू ठेवले .त्यामुळे नियमित  सराव आणि सातत्य राहिले व यश संपादन करता आले. यापुढेही यशाची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील .




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.