Skip to main content

रब्बी हंगाम मधील अनुदानित बियाणे घटकासाठी महाडीबिटी पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:






कृषि विभागामार्फत शेतक-यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने महा-डीबीटी पोर्टल विकसित केले आहे. महाडीबीटी पोर्टलमार्फत शेतक-यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके अंतर्गत सन 2021 - 2022 रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरण, पिक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलमार्फत मागविण्यात येत आहेत.  30 ऑगस्ट 2021 ते 10 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे, विहीत मुदतीत नोंदणी करणा-या शेतक-यांचाच विचार केला जाईल, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कळविले आहे.एकुण किंमतीच्या 50 टक्के मर्यादित अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणास एका शेतकऱ्याला 2 हेक्टरपर्यंतच लाभ दिला जाणार आहे.

ज्वारी, हरभरा ही पिके असून प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाच्या आतील वाण ज्वारी - 30 (प्रति किलो), हरभरा - 25 (प्रति किलो), तसेच 10 वर्षाच्या वरील वाण ज्वारी - 15 (प्रति किलो), हरबरा - 12 (प्रति किलो) असे आहे.पिक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पिक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित शेतक-यांनी आपल्या गावच्या कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन 10 हेक्टर क्षेत्र असणा-या गटांनी नोंदणी करावी. पिक प्रात्यक्षिकांसाठी एका शेतक-याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध होणार आहे. बियाणे जैविक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये पिक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी पिक प्रात्यक्षिकांसाठी एका शेतक-याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध होणार आहे. या निविष्ठांसाठी शेतक-याला एक एकराच्या मर्यादित पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार 2000 ते 4000 प्रतिएकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान दिले जाणार आहे. यासाठी जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.शेतक-यांची निवड ऑनलाइन लॉटरी पध्दतीने होणार आहे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कळविले आहे.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.