Skip to main content

ढगफुटीमुळे, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड प्रतिनिधी:





लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे सोमवारी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे अचानक नदी - नाले तुडुंब भरून वाहिले. मुसळदार पावसानंतर शेतात गेलेले दगडगावे कुटुंब बैलगाडीत बसून गावाकडे रिसनगावकडे निघाले. रस्त्यात हुलायवाडीची नदी ओलांडून घराकडे येत असतानाच जोरदार पुराची लाट आली. त्यात बैलगाडी उलटून त्यात गाडीतील पाचजण नदी प्रवाहात वाहून गेले.

या भीषण घटनेमध्ये दोन सख्ख्या जावा बुडून मरण पावल्या आहेत. तर तिघाजणांनी नदीपात्रातील झाडेझुडपांना घरून स्वतःचा जीव वाचविला. या घटनेमुळे सावरगावावर शोककळा पसरली.
नगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पाथर्डी तालुक्यात १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पाथर्डी तालुक्यात घरे पडली, पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील काही तास पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवान विभागाने वर्तविला आहे.

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदीसह उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. छोटे-मोठे बंधारे, पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. सद्यस्थितीत जामदा बंधार्‍यावरून १ हजार ५०० क्यूसेक पाणी जात असून, दुपारनंतर त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
गिरणा नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात आज दुपारनंतर पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, तितूर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शहरात पाणी घुसले. नदीकाठी असलेली घरे तसेच बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसर, रोशननगर, जहांगीरदार वाडी, बाराभाई मोहल्ला, शिवाजीनगर, घाट रोड भाजीबाजार हा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने काल रात्रीपासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये पाणी तुंबले असून गिरणा व तितूर नद्यांना पूर आला आहे. तितूर नदीला आलेल्या पुरामुळे कजगाव-नागद, खाजोळा-नेरी-नागद रस्ता बंद झाला आहे. या गावांचा रात्रीपासून संपर्क तुटला आहे. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.