Skip to main content

ढगफुटीमुळे, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड प्रतिनिधी:





लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे सोमवारी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे अचानक नदी - नाले तुडुंब भरून वाहिले. मुसळदार पावसानंतर शेतात गेलेले दगडगावे कुटुंब बैलगाडीत बसून गावाकडे रिसनगावकडे निघाले. रस्त्यात हुलायवाडीची नदी ओलांडून घराकडे येत असतानाच जोरदार पुराची लाट आली. त्यात बैलगाडी उलटून त्यात गाडीतील पाचजण नदी प्रवाहात वाहून गेले.

या भीषण घटनेमध्ये दोन सख्ख्या जावा बुडून मरण पावल्या आहेत. तर तिघाजणांनी नदीपात्रातील झाडेझुडपांना घरून स्वतःचा जीव वाचविला. या घटनेमुळे सावरगावावर शोककळा पसरली.
नगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पाथर्डी तालुक्यात १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पाथर्डी तालुक्यात घरे पडली, पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील काही तास पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवान विभागाने वर्तविला आहे.

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदीसह उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. छोटे-मोठे बंधारे, पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. सद्यस्थितीत जामदा बंधार्‍यावरून १ हजार ५०० क्यूसेक पाणी जात असून, दुपारनंतर त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
गिरणा नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात आज दुपारनंतर पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, तितूर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शहरात पाणी घुसले. नदीकाठी असलेली घरे तसेच बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसर, रोशननगर, जहांगीरदार वाडी, बाराभाई मोहल्ला, शिवाजीनगर, घाट रोड भाजीबाजार हा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने काल रात्रीपासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये पाणी तुंबले असून गिरणा व तितूर नद्यांना पूर आला आहे. तितूर नदीला आलेल्या पुरामुळे कजगाव-नागद, खाजोळा-नेरी-नागद रस्ता बंद झाला आहे. या गावांचा रात्रीपासून संपर्क तुटला आहे. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे.




पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.