Skip to main content

मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींचं कौतुक करत म्हटलं, महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:





राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथील कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचे जाहीर कौतुक केले. यासोबतच त्यांनी नितीन गडकरींकडे मदतीची मागणी सुद्धा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, आजच्या या कार्यक्रमाचे... नितीन गडकरी तुमचं काय वर्णन करु.. प्रमुख पाहुणे... नितीनजींची एक वेगळी ओळख आहे. नितीनजी मी उगाचच तुमचं कौतुक करत नाही. मला आठवतयं महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरे महामार्गाने जोडली. या शहरांत जाण्यासाठी पाच-पाच सहा-सहा तास लागायचे जे आता दोन तासांत होत आहे. तुमच्याजागी दुसरं कुणी असतं तर म्हटलं असतं पाहतो मी कसं करता येईल पण तुम्ही ते करुन दाखवलं. आता तिच तुमची ओळख देशभरात निर्माण करत आहात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, मुंबई आणि नागपूर हे आपली राजधानी, उपराजधानी आणखी जवळ आणत आहोत. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. नितीनजी मला आणखी एका कामासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. कोरोनाचं संकट सुटू असताना नैसर्गिक आपत्ती येण्यास सुरूवात झाली आहे. तौत्के चक्रीवादळातून सावरत असताना आता महापूर आला. या संकटातून आपण सावरू नक्कीच. पण हे करत असताना विकास कामे जी आपण करत आहोत साहजीकच यामध्ये नवीन रेल्वेमार्ग, रस्ते, बांधकामे, नवीन उड्डाणपूल यांची मांडणी करताना जोडणी करताना पर्यावरणाचा विचार करुन करत आहोत हे सुद्धा खरं आहे. 

मात्र, आता आपल्या राज्यात रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही मागे बोलले होते आणि तुम्ही ते केलं की रस्ते असे तयारव व्हायला हवेत की खड्डे पडले नाही पाहिजेत. महापुरात रस्त्येच्या रस्ते खचत आहेत. पुन्हा पुढील वर्षी संकट येऊ शकतात. येऊ नये अशी प्रार्थना आहे. काही ठिकाणी घाट खचले आहेत, पूर वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत तुमची मदत पाहिजे. सर्व तंत्रज्ञानाची महाराष्ट्राला गरज आहे. जे काम केलं आहे त्याची मजबुतीकरण कसं करता येईल हे सुद्धा पाहायला हवं.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.