Skip to main content

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते बालस्नेही पोलीस केंद्राचे उदघाटन

मंचर प्रतिनिधी:


मंचर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात महाराष्ट्रातील चौथ्या आणि पुणे जिल्ह्यातील पहिल्याच बालस्नेही पोलीस स्टेशनचा उदघाटन सोहळा आज ३१ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला. जुवेनाईल जस्टीस कायद्याच्या कलम ३७ प्रमाणे सदर बालस्नेही केंद्र तथा स्टेशनची स्थापना करटण्यात अली आहे. या उपक्रमाचे उदघाटन पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या   सोहळ्याच्या तसेच मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या सेवपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना निवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या.



आंबेगाव तालुक्यातील नागापूरच्या माजी महिला सरपंच वैशाली पोहकर आणि इतर सहकारी महिलांच्या मागणीपश्चात; पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मंचर येथे राज्यातील चौथे आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील पहिलेच असणारे बालस्नेही पोलीस स्टेशन येणाऱ्या काळात एक आदर्श ठरेल असे मत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी कलाशिक्षक संतोष चव्हाण, संदीप क्षीरसागर, दीपक चवरे, उद्योजक अजय घुले यांनी सहकार्य केले.

सुधाकर कोरे यांना मंचर पोलीस स्टेशनमध्ये खूप कमी काळ मिळूनही त्यांनी धडाकेबाज काम करून दाखवले. अगदी निवृत्तीच्या दिवशी देखील बालस्नेही सारखा उपक्रम सुरू करून कोरे यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. असे कर्तव्यदक्ष अधिकारी निवृत्त होत असताना सहकाऱ्यांना वाईट वाटते. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला गणवेशाची एव्हडी सवय असते, की तो त्या अधिकाऱ्याच्या शरीराचा आणि एकंदरीतच जीवनाचा एक भाग असतो. त्या अधिकाऱ्यालाही नाईलाजाने निवृत्ती स्वीकारावीच लागते. परंतु असे अधिकारी निवृत्त होत असताना, आपल्या कामातून मागे जो आदर्श ठेवून जातात तो अतिशय प्रेरणादायी असतो. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी देखील असाच आदर्श ठेवला आहे. अशा शब्दांत डॉ. देशमुख यांनी आपले मत मांडले.



सदर कार्यक्रमात ऍड. संध्या बाणखेले, मनीषा गावडे, मालती थोरात, प्रमिला टेमगिरे आदि महिलांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कातोळे यांनी केले, तर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लांभाते यांनी आभार मानले. यावेळी खेड चे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, घोडेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, मंचर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर शेटे, उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, उपनिरीक्षक अपर्णा जाधव, उद्योजक अजय घुले, जेष्ठ पत्रकार डी. के. वळसे, संतोष वळसे, मंचर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, दक्षता समितीचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर टॅप करा.

https://fb.watch/750TA4WRmU/

____________________________________

सिंघम पोलीस अधिकारी सुधाकर कोरे निवृत्त होत असतानाएक चांगला सहकारी सोबत नसणार याचे दुःख वाटते. कोरे यांना त्यांचे निवृत्तीपश्चातचे आयुष्य आरोग्यदायी जावो यासाठी शुभेच्छा - डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.