Skip to main content

दोन गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी मिळालेल्या बांदलवर आता हवेलीतही गुन्हा दाखल

केसनंद प्रतिनिधी:






हवेली तालुक्यात एका शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेत बोजा कमी करण्यासाठी पून्हा एक कोटी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल व साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे व विकास भोंडवे यास अटक केली आहे.

गुन्हा दाखल केलेल्यामध्ये संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी आदींचा समावेश आहे. याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय ७४, रा. वढु खुर्द, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी : सन २०१३ मध्ये फिर्यादी गंगाराम सावळा मासाळकर यांच्या मालकीच्या मौजे वढू खुर्द, (ता. हवेली, जि. पुणे) येथील गट क्र. १५३/१ मध्ये ३ हेक्टर ७१ आर या जमिनीचे गहाणखत आपसात संगनमताने करण्यासाठी मंगलदास बांदल, संदिप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे व शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी यांनी फिर्यादीला त्यांच्या चारचाकी मोटारीमध्ये डांबून ठेवून दमदाटी करून व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने करून एकूण सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये परस्पर काढून घेतले. तसेच जमीनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयाची मागणी केली.

संबंधित व्यक्तींचे राजकीय लागेबांधे असल्याने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यास कुटुंबियांना त्रास देतील म्हणून फिर्यादीने आतापर्यंत तक्रार दिलेली नव्हती. परंतु अदयापपर्यंत जमीनीवरील बोझा कमी केला नाही, म्हणून फिर्यादीने त्यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे व विकास भोंडवे यास अटक केली आहे. अधिक तपास पुणे शहर गुन्हे शाखेच्या यूनिट सहाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.

दरम्यान, शिरूर तालुक्यामध्ये शिक्रापूरात दत्तात्रेय मांढरे यांच्या अशाच फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात बांदलसह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी मिळालेल्या बांदलवर आता हवेलीतही गुन्हा दाखल झाल्याने बांदलसह इतर साथीदारांच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.