Skip to main content

आजची तरुणाई "अंध" प्रेमाची "धुंद"

जळगाव प्रतिनिधी:










प्रेमाला वय नसते... असे म्हटले जाते मात्र संस्कृतीचा अभाव आणि ज्ञानाची शिदोरी मिळत नसल्याने अल्पवयीन मुले-मुली प्रेमात पडून हट्टी बनले आहेत. त्यामुळे पालकांवरच हतबल होण्याची वेळ आल्याचा प्रकार नुकत्याच एका  घटनेने उघडकीस आला. पुण्यातील एक साडे सतरा वर्षांच्या तरुणीची अमळनेरच्या एका तरुणाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली.

आणि ती त्याच्या प्रेमात पडली, प्रेम इतके उतावीळ झाले की, तरुणीने आई- वडिलांचा विचार न करता पुणे सोडले. तरुणी धुळे पोलिसांना आढळून आली. चौकशी केली असता प्रेम प्रकरण समोर आले. पोलिसांनी तिला कायद्याचे ज्ञान देऊन तू अल्पवयीन असल्याने तुझे लग्न लावू शकत नाही, असे सांगून तिच्या वडिलांना बोलावून तिला दोन दिवस बाल सुधार गृहात पाठवले. तेथे मत परिवर्तन झाले म्हणून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पालकांनी पुन्हा तिचा मार्ग चुकू नये म्हणून तिच्याकडून मोबाइल जप्त केला. मात्र, प्यार किया तो डरना क्या' म्हणत त्या तरुणीने पुन्हा पळ काढून प्रियकराचे अमळनेरचे घर गाठले. पुन्हा पालक तिला घ्यायला आले. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तरुण आणि तरुणीला कायद्याची समज दिली अन्यथा गुन्हे दाखल होतील, याची जाणीव करून ज्याच्या त्याच्या घरी जाण्यासाठी समजावले. वडील मुलीला रात्री आपल्यासोबत घेऊन पुण्याला निघाले. पण त्यांचा चेहरा एका वाट चुकलेल्या मुलीचा हतबल बाप असल्याचे स्पष्ट दाखवत होता.

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.