Skip to main content

वटवृक्षाची दोऱ्याच्या कचाट्यातून अखेर सुटका! पुण्यातील दोन तरुणींचा अनोखा उपक्रम

पुणे प्रतिनिधी:






दरवर्षी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला महिला दोरा गुंडाळून हा सण साजरा करतात. पण नंतर तो दोरा तसाच वडाला कित्येक दिवस राहतो. त्यामुळे वडाचे नुकसानही होते. झाडाचा हा त्रास कमी करण्यासाठी दोन तरूणींनी हा दोरा काढून झाडांना मोकळे करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत दहा-बारा वृक्षांचा दोरा काढला असून तो कित्येक किलो भरला आहे. तो सर्व दोरा त्यांनी महापालिकेच्या कचरावेचकांना तो सर्व सुपूर्द केला.

पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा पूजेचा एक हेतू समजला जातो. पण वडाभोवती दोरा गुंडाळण्याचे ठोस कारण मात्र अद्याप कोणालाही समजलेले नाही. पण या प्रथेमुळे मात्र दरवर्षी अनेक वटवृक्षांना आवळले जाते. त्या वृक्षांच्या भावना दोन तरूणींनी जाणल्या आणि त्यांना मुक्त करण्याचा निर्धार केला. श्वेता शारदा नथू साठे आणि कल्याणी संध्या या दोघींनी हा उपक्रम सुरू केला आहे. श्वेता हिने गेल्या वर्षी या कामाला सुरवात केली होती. त्यानंतर यंदाही कायम ठेवला.

श्वेता ही काही वर्षांपासून अंघोळीची गोळी या मोहिमे अंतर्गत काम करत आहे. झाडांना जीव असतोच आणि त्यांचा सुद्धा जीव गुदमरुन त्यांना सुद्धा दम लागतो. झाडांना खिळे ठोकले, दोरे गुंडाळले, तारा गुंडाळल्या की, त्यांचे विघटन झाडामध्ये होत असते. जे आपल्याला दिसत नाही आणि हे विघटन अर्धवट होते.  तारा, खिळे ह्यांना गंज लागतो, तो गंज पर्यायाने झाडाला लागतो. दोऱ्यांचेही तसेच आहे. पावसाळ्यात हे दोरे झाडाला आवळून बसतात. त्यामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊ लागतो. म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे कल्याणी हिने सांगितले.

एका झाडाचा दोरा काढायला दहा मिनिटे लागतात. तो सर्व एकत्र करून पालिकेच्या कचरावेचकांना देण्यात येतो. मोठ्या वडाच्या झाडाला एका वेळी पाच ते आठ किलो इतक्या वजनाचा दोरा निघतो.

लोकांना झाडांच्या भावना समजून सांगताना श्वेता म्हणते " झाडांचा जीव गुदमरतो म्हणून आम्ही त्यांना मोकळं करतोय. सकाळी उठून हे काम करायला जायला अनेकांना नक्कीच कंटाळा येईल, पण दोऱ्याच्या कचाट्यातून झाडाला मुक्त केल्याचे एक मोठं समाधान नक्की मिळेल. असे श्वेता शारदा नथू साठे यांनी सांगितले आहे.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.