Skip to main content

डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी आणि??? कोरोना योद्ध्यांच्या यादीत शिक्षकाचा विसर...

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:





मार्चपासून कोरोणा महामारीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. स्वप्नातही कुणी विचार केला नाही, असे संकट जगासमोर ओढवले. अशा काळात संपूर्ण जग घरात असताना डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी या चार घटकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, परंतु सर्वेक्षण, भरारी पथक, नियंत्रक अधिकारी, टोलनाक्यावरील ड्युटी, पेट्रोल पंपावरील ड्युटी, समुपदेशन आशा अनेक ड्युट्या करूनही कोरोणा योद्ध्यांच्या यादीतला समाजातील पाचवा घटक, शिक्षक हा मात्र कोरोणा योद्ध्याच्या यादीतून उपेक्षितच राहिला आहे.

मार्चपासून शाळा बंद आहेत पण शिक्षण बंद नाही.शिक्षक काय करत आहे असा प्रश्न निश्चितच समाजातील प्रत्येकाला पडत होता, परंतु आशा महामारीच्याच्या काळात शिक्षक गुगल मीटिंग, झूम मीटिंग, व्हाट्सअप ग्रुप या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवून त्याने शिक्षण प्रक्रिया कुठेच खंडित केली नाही. कोरोना काळातही तो विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिला.एवढेच नव्हे तर सर्वेक्षण, भरारी पथक, नियंत्रक अधिकारी, टोलनाक्यावरील ड्युटी, पेट्रोल पंपावरील ड्युटी, समुपदेशन आशा अनेक कामांच्या माध्यमातून त्यांनी देशाला राष्ट्रीय कामात मदत केली. कोरोना योद्ध्यांच्या यादीत नाव असो अगर नसो पण त्यांने आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले आणि राष्ट्रीय कामात हातभार लावला.

कोरोना काळातील आपली ड्युटी पार पाडत असताना अनेक शिक्षक कोरणा बाधित झाले तर काही त्यात दगावलेही.काही अपघाताचेही शिकार झाले परंतु या जागतिक महामारीच्या संकटात शिक्षिक कुठेही कमी पडले नाहीत किंवा मागे हटलेही नाहीत. त्यांनी या संकटाचा अत्यंत धैर्याने मुकाबला केला.कधी आरोग्य विभागाशी निगडित नसलेल्या शिक्षकांने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी खांद्याला खांदा लावून काम केले.

आज या शिक्षकाला कोरोणा योद्ध्या म्हणून पुरस्कार मिळावा,अशी अपेक्षा नाही किंवा चार घटकांच्या यादीत आपले नाव द्यावे, अशीही अशा नाही. परंतु समाजाने या पाचव्या घटकाचा सन्मान ठेवावा,हीच माफक अपेक्षा आहे.कारण कोरोणा काळात यांनीही इतरांप्रमाणे राष्ट्रीय कामात खारीचा वाटा उचलला आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.