Skip to main content

दिव्यांग बहिणीसह आई आणि भावाला काढले घराबाहेर.

जुन्नर प्रतिनिधी:





जुन्नर तालुक्यातील मौजे कुसुर येथील दिव्यांग भगिनी जयश्री वसंत दुराफे या महिलेस तिच्या स्वमालकीच्या घरांमधून तिच्या भावाने अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ करून घरामधून बाहेर काढले होते. तिला न्याय मिळवून देण्यासाठी व तिचे हक्काचे घर तिला परत मिळवून देण्याची मागणी दिव्यांग विकास संस्थेने एका निवेदनाद्वारे जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्याकडे केली आहे.

सविस्तर वृत्त असे की दिव्यांग महिला जयश्री दुराफे तिचा पॅरेलेस झालेला बंधू  व डायबिटीस ग्रस्त आई, या तिघांना भावाने, अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ करत  रात्री नऊ वाजता घरामधून बाहेर काढले होते. 

हि माहिती समजताच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ भोसले यांना समजल्यानंतर पुणे येथील दिव्यांग विकास आघाडी संस्था पुणे जिल्हा चे संस्थापक अध्यक्ष बाजीराव उर्फ नानासाहेब पारगे यांंनी सांगितले. त्यानंतर प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंंद्रचे  दीपक चव्हाण, अरुण शेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पिडितांना मदतीचे आश्वासन दिले.

दि. 26 जून रोजी प्रहार अपंग क्रांती संघटना, दिव्यांग विकास संस्था, अपंग जनता दल, रुद्र दिव्यांग सामाजिक संस्था, या सर्व संघटनेच्या माध्यमातून जुन्नर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक यांना पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासंदर्भात, व तिचे हक्काचे घर मिळवून देण्यासंदर्भात निवेदन देऊन तिचे घर तिच्या ताब्यात देण्यात आले. तसेच दिव्यांगांच्या शेतजमीनीवर जबरदस्ती कब्जा केला आहे.त्यांंना लवकरच दिव्यांग 2016 च्या  कायदा नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी, दिव्यांग विकास संस्था संस्थापक अध्यक्षनानासाहेब पारगे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सोमनाथ भोसले, दिव्यांग प्रकोष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप कामटे, अपंग जनता दलचे भाऊसाहेब जगदाळे, रुद्र दिव्यांग सामाजिक संस्था पुणे व प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरुण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सौरभ मातेले, सविता ताई दुराफे, ज्ञानदेव बांगर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.