Skip to main content

खेड घाटाचे काम करणाऱ्या कंपनीला दणका, ३ कोटी ३२ लाखांचा दंड

 खेड प्रतिनिधी:








पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटाचे काम करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीला खेडच्या  तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी अनाधिकृत उत्खननाबाबत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड कंपनीने वेळेत न भरल्यामुळे अनाधिकृतरित्या मुरूम दगड साठविलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावर त्याची बोजा नोंद करण्यात आली आहे. गेली दोन वर्षापासून खेड बायपास घाटाचे काम सुरू आहे. हे काम रोडवेज सोल्युशन कंपनीने घेतले आहे. काम करताना  सुरूंग लावून डोंगर फोडण्यात आला आहे. डोंगर फोडताना या ठिकाणी मोठया प्रमाणात मुरुम, दगडाचे उत्खनन झाले.

 हा मुरुम सस्त्याच्या कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र संबंधित ठेकेदाराने खाजगी शेतकऱ्याच्या जागे ८ हजार ब्रास मुरुम,  माती,  दगड याचा साठा केला असल्याची बाब समोर आली आहे . 

गेली दोन वर्षापासून खेड बायपास घाटाचे काम सुरू आहे. हे काम रोडवेज सोल्युशन कंपनीने घेतले आहे . काम करताना  सुरूंग लावून डोंगर फोड०यात आला आहे .डोंगर फोडताना या ठिकाणी मोठया प्रमाणात मुरुम, दगडाचे उत्खनन झाले . हा मुरुम सस्त्याच्या कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र संबंधित ठेकेदाराने खाजगी शेतकऱ्याच्या जागेत गट क्रमांक ७४/३ मध्ये ८ हजार ब्रास मुरुम,  माती,  दगड याचा साठा केला . त्याचा एका शेतकऱ्याला फायदा झाला . हा साठा करताना या हिस्सातील दोन शेतकऱ्यानी मुरुम साठा करण्यासाठी ना हरकत स्टॅम्प पेपरवर लिहून दिली होती. या भरावाबाबत हरकत घेऊन  कोर्टात वाद या जमिनी  बाळासाहेब शामराव थिगळे या शेतकऱ्याने त्याबाबत उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १३ यांचेकडे तक्रार केली होती  या अनाधिकृत भरावाबाबत   तहसिलदारांनी पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यामुसार आनंदा थिगळे, शांताराम थिगळे, दशरथ थिगळे यांच्यासह कंपनीला नोटीस काढून म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. शासनाने कंपनीला झालेल्या दंडाची रक्कम निविदा रकमेतून कमी करून बोजा काढून टाकावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पंचनाम्यानुसार सदर गौण खनिज रस्त्याचे कामासाठी वापरणे गरजेचे होते . मात्र कंपनीने परवानगी न घेता खाजगी खोलगट जागेत भराव  करून संबधितांना फायदा पोहचावला . या अनाधिकृत भराव व उत्खनन याबाबत कंपनी व शेतकरी दंडात्मक कारवाईस पात्र आहेत .


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.