Skip to main content

खेड घाटाचे काम करणाऱ्या कंपनीला दणका, ३ कोटी ३२ लाखांचा दंड

 खेड प्रतिनिधी:








पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटाचे काम करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीला खेडच्या  तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी अनाधिकृत उत्खननाबाबत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड कंपनीने वेळेत न भरल्यामुळे अनाधिकृतरित्या मुरूम दगड साठविलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावर त्याची बोजा नोंद करण्यात आली आहे. गेली दोन वर्षापासून खेड बायपास घाटाचे काम सुरू आहे. हे काम रोडवेज सोल्युशन कंपनीने घेतले आहे. काम करताना  सुरूंग लावून डोंगर फोडण्यात आला आहे. डोंगर फोडताना या ठिकाणी मोठया प्रमाणात मुरुम, दगडाचे उत्खनन झाले.

 हा मुरुम सस्त्याच्या कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र संबंधित ठेकेदाराने खाजगी शेतकऱ्याच्या जागे ८ हजार ब्रास मुरुम,  माती,  दगड याचा साठा केला असल्याची बाब समोर आली आहे . 

गेली दोन वर्षापासून खेड बायपास घाटाचे काम सुरू आहे. हे काम रोडवेज सोल्युशन कंपनीने घेतले आहे . काम करताना  सुरूंग लावून डोंगर फोड०यात आला आहे .डोंगर फोडताना या ठिकाणी मोठया प्रमाणात मुरुम, दगडाचे उत्खनन झाले . हा मुरुम सस्त्याच्या कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र संबंधित ठेकेदाराने खाजगी शेतकऱ्याच्या जागेत गट क्रमांक ७४/३ मध्ये ८ हजार ब्रास मुरुम,  माती,  दगड याचा साठा केला . त्याचा एका शेतकऱ्याला फायदा झाला . हा साठा करताना या हिस्सातील दोन शेतकऱ्यानी मुरुम साठा करण्यासाठी ना हरकत स्टॅम्प पेपरवर लिहून दिली होती. या भरावाबाबत हरकत घेऊन  कोर्टात वाद या जमिनी  बाळासाहेब शामराव थिगळे या शेतकऱ्याने त्याबाबत उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १३ यांचेकडे तक्रार केली होती  या अनाधिकृत भरावाबाबत   तहसिलदारांनी पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यामुसार आनंदा थिगळे, शांताराम थिगळे, दशरथ थिगळे यांच्यासह कंपनीला नोटीस काढून म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. शासनाने कंपनीला झालेल्या दंडाची रक्कम निविदा रकमेतून कमी करून बोजा काढून टाकावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पंचनाम्यानुसार सदर गौण खनिज रस्त्याचे कामासाठी वापरणे गरजेचे होते . मात्र कंपनीने परवानगी न घेता खाजगी खोलगट जागेत भराव  करून संबधितांना फायदा पोहचावला . या अनाधिकृत भराव व उत्खनन याबाबत कंपनी व शेतकरी दंडात्मक कारवाईस पात्र आहेत .


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.