Skip to main content

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लोणी, चांडोली, तळेघर येथे पेट्रोल पंप चालू होणार

मंचर प्रतिनिधी:




मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही दिवसातच लोणी, चांडोली, तळेघर येथे पेट्रोल पंप चालू करण्याचे नियोजित आहे, तर चांडोली येथे एक हजार मेट्रिक टनचे गोडाऊन व शेतकऱ्यांसाठी शीतगृह बांधण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

लोणी ता. आंबेगाव येथील उपबाजारात विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी देवदत्त निकम बोलत होते, यावेळेस माजी आमदार पोपटराव गावडे,कात्रज दुध संघाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,प्रकाश पवार,दादाभाऊ पोखरकर,शिरूर बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर,आर.आर. वाळुंज,गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड,रामदास जाधव,अशोक आदक, उदय डोके बाजार समितीचे सर्व संचालक व सचिन बोऱ्हाडे, कर्मचारी उपस्थित होते.

देवदत्त निकम म्हणाले लोणी उपबाजारात शिरूर तालुक्यातील काही भाग तसेच नागापूर, रांजणी, वळती,निरगुडसर, अवसरी, पारगाव, शिंगवे, लोणी,धामणी,खडकवाडी, पोंदेवाडी, वाळुजनगर,वडगावपीर, पहाडदरा या परिसरातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते त्यासाठी ६०×३०० फुटाचे कांदा लिलाव शेड उभारण्यात येणार आहे, मागील वर्षी या उपबाजारात सुमारे साडेतेरा कोटीची कांदा विक्री झाली आहे. येत्या काही दिवसात 60 टन इलेक्ट्रॉनिक वजन काटा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, या उप बाजारात कांदा या शेतमालावर कोणताही कडता घेतला जात नाही, शेतकऱ्यांना कांदा लिलाव आनंतर 48 तासात मालाचे पेमेंट केले जाते सर्व लिलाव हे बाजार समिती मार्फत केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो,असे निकम यांनी सांगितले.

विवेक वळसे पाटील म्हणाले की लोणी हे गाव पूर्वी मोठी बाजारपेठ म्हणून समजली जात होती सध्या पूर्वीसारखी बाजारपेठ राहिली नसून सध्या लोणी उपबाजार च्या निमित्ताने या परिसरात अनेक सोयी निर्माण होत आहेत, त्यामुळे या परिसराचा विकास होण्यास नक्कीच फायदा होईल आर्थिक स्तर उंचावेल असे वळसे-पाटील म्हणाले.

पोपटराव गावडे म्हणाले बाजार समितीत काम करताना शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान होणार नाही असे निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल असे गावडे म्हणाले.

यावेळेस लोणी गावचे सरपंच उर्मिला धुमाळ विक्रेते महेंद्र वाळुंज,प्रकाश बापू पवार,विष्णू काका हिंगे यांनी आपले मनोगत मांडले.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.