Skip to main content

नोकरीला लावतो म्हणत केली ४ लाखांची फसवणूक, दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंचर प्रतिनिधी:




मंचर तालुका आंबेगाव येथील तरुणीला रेल्वे मध्ये नोकरीला लावते असे म्हणत तिच्या वडिलांकडून 4 लाख रुपये घेऊन तिची फसणुक केल्याने नूरजहाँ बाबासाहेब मुलानी, गिरीश बंडू मुसळे राहणार किवळे देहू रोड पुणे यांच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत अस की फिर्यादी नामदेव रामभाऊ शिंदे राहणार मंचर यांच्या मुलीचे शिक्षण M.E. झाले असून तिच्यासह घरचे लोक नोकरी शोधत होते. नोकरी संदर्भात त्यांनी अनेकांना सांगितलं देखील त्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये तक्रारदार यांचे मेहुणे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून फिर्यादी यांची आरोपी मुलानी यांच्याशी ओळख झाली. तिने सांगितलं की मी गरजवंताना रेल्वे, मंत्रालय, महेंद्रा, टाटा मोटर्स, मर्सडिज बेझ, अश्या असंख्य ठिकाणी नोकरीला लावले आहे. त्याचबरोबर बँकांमधून काढून देते त्याच बरोबर मोठ मोठ्या अधिकाऱ्यां पासून ते मंत्र्यांन पर्यंत ओळखी आहेत. मी तुमच्या मुलीला रेल्वे मध्ये नोकरीला लावेल असे सांगितले
तद नंतर मुलानी या फिर्यादी व त्यांची मुलगी यांच्या संपर्कात राहून त्यांचा विश्वासात घेऊन व त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीला कामाला लावण्यासाठी 4 लाख रुपये खर्च येईल असे देखील सांगितले फिर्यादी यांनी त्यांच्या मेहुण्याच्या ओळखीचे असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवत फिर्यादी यांनी 17डिसेंबर 2018 ला 2 लाख त्याचबरोबर 18 डिसेंबरला 1 लाख, 29 डिसेंबरला 50 हजार त्यानंतर 8 जानेवारी 2019 ला 50हजार असे मिळून 4 लाख रुपये आर. टी. जी. एस ने नूरजहाँ मुलानी हिच्या बँक खात्यावर पाठविले.
त्यानंतर बरेच दिवस फिर्यादी शिंदे यांनी मुलानी यांना फोन करून नोकरी संदर्भात विचारपूस केली असता मुलानी ह्या उडवा- उडवी करू लागले त्यानंतर शिंदे हे मुलानी यांनी दिलेल्या पत्त्यावर गेले असता ते त्या ठिकाणी राहत नसल्याचे समजले त्यानंतर शिंदे यांना समजलं की आपली फसवणूक झालेली आहे त्या नंतर त्यांनी थेट मंचर पोलिस स्टेशन मध्ये फसवणूक केल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.