Skip to main content

सत्ता नसल्यामुळे भाजप कासावीस- राजू शेट्टींची टीका

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:






''भाजपकडे सत्ता नसल्यामुळे कासावीस झाले आहेत, त्यांनी कुणकुणाची जात काढली आहे ते आम्हाला माहिती आहे. राज्यपालांना सध्या वेळ नाहीय, वेळ मिळेल तेव्हा ते सही करतील'' असे वक्तव्य माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.

''गेल्या वर्षी एफआरपी अदा केली ती तुकड्या तुकड्याने कारखांदारांनी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना व्याज दिले पाहिजे अन्यथा कारवाई झाली पाहिजे. तातडीने व्याज मिळावे अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची राजू शेट्टी यांनी आज भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी,''इथेनॉलमधला हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ऊस दर नियंत्रण समिती आहे त्यासंदर्भात विचारविनिमय केला, त्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार करावा. साखर कारखान्यांची शेअरची किंमत आजही एक हजारच आहे. सरकारने आपलं भाग भांडवल वाढत नाही मात्र शेतकऱ्यांना भागभांडवल वाढवायला सांगतेय. ऊस दर नियंत्रण समितीत सदस्य घेतले आहेत ते नामधारी आहेत, त्यांना ऊस शेतीचा अभ्यास नाही. ज्यांना कारखान्याचा संचालक व्हायचे असेल तर त्यांनी 25 लाखाचे शेअर घेतले पाहिजे. याबाबतीत सरकारने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही कोर्टात धाव घेऊ. आधीच्या भाजप आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारने ज्या लोकांना समितीत घेतले ते मंत्र्यांच्या जवळचे आहेत.'' अशी माहिती राजू शेट्टी यांनी सांगितली

 


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...