Skip to main content

दुसरी लाट जाऊच द्यायची नाही म्हणजे तिसरी येणारच नाही, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:





मालाडमध्ये  जंबो कोविड सेंटरचे लोकार्पण सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आरोग्य यंत्रणांवर ताण असूनही राज्याने कोरोनाची दुसरी लाट थोपवली. आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने रस्त्यांवर पुन्हा गर्दी  होऊ लागली आहे. तिसरी लाट कधी येईल माहिती नाही. पण गर्दी वाढत गेली तर दुसरीच लाट पुन्हा आपल्यावर उलटेल...". मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्याला भाजपच्या अतुल भातखळकरांनी सडेतोड उत्तर दिले.

राज्यात दोन आठवडे लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारने पुन्हा हे निर्बंध लागू केले. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या रोजीरोटीवर होत असल्याचे वास्तव समोर दिसत असूनही या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यास राज्य सरकारवर तयार नाही. तशातच सोमवारी मालाडमध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात कोविडच्या दुसऱ्या लाटेची भीती उपस्थितांना दाखवली. याच मुद्द्यावरून भाजपचे अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर टीका केली. "तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल असे उपदेशाचे डोस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. आता मुख्यमंत्री ज्या पद्धतीने गर्दी करत आहेत; तशीच गर्दी करत राहिले तर आता असलेली दुसरी लाट जाणारच नाही आणि मग तिसरी लाट येण्याचा प्रश्नच राहत नाही. कदाचित तिसरी लाट येऊ नये म्हणून मुख्यमंत्री दुसरी लाट जाऊ देणार नसतील हा त्यांचा तिसर्या लाटेला थोपाविण्यासाठीचा करेक्ट कार्यक्रम आहे का? असा खोचक सवाल त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.