Skip to main content

राज्यात संपूर्ण लॉकडाउन नकोच, केंद्रीय पथकाचे स्पष्ट मत

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:




शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सध्याचे निर्बंध पुरेसे असून, पूर्ण लॉकडाउनची गरज नसल्याचे मत केंद्र सरकारच्या पथकाने व्यक्त केले आहे. या पथकाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये कोरोना संकट हाताळणीबाबत पुण्याच्या स्थानिक यंत्रणांचा केंद्र व राज्य सरकारशी असलेल्या समन्वयावर गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पुण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 'करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध पुरेसे आहेत. पूर्ण लॉकडाउनची गरज नाही,' असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अंदाज न आल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, गेल्या दोन महिन्यांत दोन्ही महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा कालावधी असतानाही फारशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. शहरातील करोना चाचण्यांची क्षमता वाढलेली नाही. 'एनआयव्ही'सारखी सरकारी यंत्रणा चाचण्या करण्याचे बंद करते; तर दुसरीकडे अद्यावत तंत्रज्ञान असतानाही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यात येत नाहीत. कोरोना रुग्णसंख्या वाढलेल्या भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे केल्यास निर्बंध कसे लावायचे याचा निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येईल, अशी सूचनाही या पथकाने केली आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.