Skip to main content

राज्यात संपूर्ण लॉकडाउन नकोच, केंद्रीय पथकाचे स्पष्ट मत

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:




शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सध्याचे निर्बंध पुरेसे असून, पूर्ण लॉकडाउनची गरज नसल्याचे मत केंद्र सरकारच्या पथकाने व्यक्त केले आहे. या पथकाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये कोरोना संकट हाताळणीबाबत पुण्याच्या स्थानिक यंत्रणांचा केंद्र व राज्य सरकारशी असलेल्या समन्वयावर गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पुण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 'करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध पुरेसे आहेत. पूर्ण लॉकडाउनची गरज नाही,' असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अंदाज न आल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, गेल्या दोन महिन्यांत दोन्ही महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा कालावधी असतानाही फारशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. शहरातील करोना चाचण्यांची क्षमता वाढलेली नाही. 'एनआयव्ही'सारखी सरकारी यंत्रणा चाचण्या करण्याचे बंद करते; तर दुसरीकडे अद्यावत तंत्रज्ञान असतानाही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यात येत नाहीत. कोरोना रुग्णसंख्या वाढलेल्या भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे केल्यास निर्बंध कसे लावायचे याचा निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येईल, अशी सूचनाही या पथकाने केली आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...