Skip to main content

लसीकरणही पक्षीय नियंत्रणात, लोकशाहीला धोका

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:







कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्राला घेरले आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. पण सध्या राज्याचे राजकारण हे लसीभोवती फिरताना दिसत आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचा छळ करत असल्याचा आऱोप राज्यातील सत्ताधारी करत आहेत. तर आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्रावर आरोप करत असल्याचे विरोधक म्हणतायत. पण आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता केंद्रात सत्ता असलेल्या भाजपची राज्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आहे, तिथेच लसीचे ज्यादा डोस मिळणार का असा सवाल निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी एक ट्विट केले आहे आणि म्हटले आहे की, पंतप्रधान यांनी खास पुणेकरांसाठी २ लाख ४८ हजार कोरोना लस देण्याचा निर्णय घेतलाय. #पुणे शहराचे खासदार पंगिरीशबाबत यांच्या पाठपुराव्याचं हे यश आहे. मी केंद्राचे सर्व पुणेकरांच्या वतीने आभार मानतो.

यावर भाजपच्या काही समर्थकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे, पण काही शिवसेने रघुनाथ कुचिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, "ही राजकीय क्रूरता केवळ पुणेच का ? महाराष्ट्र वडिलकींच्या भावनेतुन परोपकाराची भूमिका आजपर्यंत बजावत आला. परराज्यातील कुठला ज़िल्हा, गांव नसेल, की तेथील माणुस ईथ पोट भरत नाही. त्यांच्या चुकीची क़ीमत आज राज्य भोगतंय संसर्ग का वाढ़ला ? तर केवळ मुक्त संचारामुळेच पहा उत्तर मिळेल याचं?"


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.