Skip to main content

दहावी, बारावी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात अशक्य- शिक्षणमंत्री

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:






'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात करणे शक्य नाही,' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने यापूर्वी कपात केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमानुसार परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, इयत्ता दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात ५० टक्क्यांची कपात करण्याची मागणी शैक्षणिक क्षेत्रातील घटकांकडून पुढे आली होती. त्यावर गायकवाड यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. परीक्षा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नव्याने अभ्यासक्रमात कपात शक्य नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. गायकवाड म्हणाल्या, 'करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देण्यात अनेक अडचणी आल्या. त्यांना अपेक्षित प्रमाणात शिक्षण देता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली. शिक्षण विभागाला परीक्षेचे नियोजन करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. आता अभ्यासक्रमात कपात केल्यास, परीक्षा तीन ते चार महिने पुढे ढकलाव्या लागणार आहे. आताच्या परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलणे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थीहिताचे ठरणार नाही.'
राज्य मंडळाच्या परीक्षा एप्रिल-मे या महिन्यांत होणार असल्याचे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. या वेळी गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली; तसेच शिक्षकांच्या सुविधेसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाची माहिती दिली.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.