Skip to main content

कोरोना बाधित इम्रान खान यांनी घेतली बैठक

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:





पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मागील आठवड्यात करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांनी गुरुवारी बैठकही घेतली. इम्रान खान यांच्यावर आता पाकिस्तानमधून टीका होत आहे. करोनाची लागण झाल्यानंतरही इम्रान खान प्रत्यक्ष बैठक कशी करू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर दोघेही विलगीकरणात गेले होते. मात्र, इम्रान खान यांच्या बैठकीमुळे आजाराच्या गांभीर्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या बैठकीत इम्रान खान आणि बैठकीत सहभागी झालेले इतरजणांनी मास्क वापर केला होता. त्याशिवाय सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करत अंतरही ठेवले होते.

मात्र, इम्रान खान यांना या बैठकीची इतकी आवश्यकता वाटत होती तर, त्यांनी ऑनलाइन बैठक करायला हवी होती, असाही सूर उमटत आहे. अनेकांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे उदाहरण दिले. त्यांनाही करोनाची बाधा झाल्यानंतर ऑनलाइन बैठका घेत देशाचे नेतृत्व केले होते.

पाकिस्तानमधील राजकीय कार्यकर्ते रझा हरून यांनी म्हटले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी अतिशय वाईट उदाहरण समोर ठेवले आहे. ही बैठक इतकी महत्त्वाची होती. तर, त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे बैठकीत सहभागी व्हायला हवे होते. कोरोना  मार्गदर्शक निर्देशांचे उल्लंघन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.