Skip to main content

पोलिस दलालाच जनतेच्या मनातून उतरवण्याचा हा प्रयत्न- अजित पवार

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:





परमबीर सिंह यांच्या शंभर कोटीच्या आरोपानंतर पोलिस दलात ट्रान्सफर रॅकेट प्रकरणावर प्रथमच भाष्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झालेल्या फोन टॅपिंगचा अहवाल आजच गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार असल्याची दिली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषदेत पोलिस बदल्यांच्या रॅकेटबाबत आरोप केल्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले होते. त्यामुळेच सीताराम कुंटे यांच्याकडून हा अहवाल आजच मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

तत्कालीन गृह विभागाचे सचिव सीताराम कुंटे हे सध्या मुख्य सचिव आहेत. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाचा अहवाल हा सीताराम कुंटे यांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या अहवालामध्ये नेमकी काय कारवाई करता येईल याबाबतची माहिती असणे अपेक्षित आहे. या संपुर्ण प्रकरणात पोलिस खात्यातील काही लोकांनी अतिशय गंभीर चूक केली आहे. पण ही चूक अतिशय गंभीर असून या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं. संपुर्ण प्रकरणात सरकार किंवा मुख्यमंत्री कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
सीताराम कुंटे हे अतिशय सरळमार्गी अधिकारी आहेत. तसेच अतिशय पारदर्शक अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. बदल्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची माहिती समोर आल्याने कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळेच पोलिस दलालाच जनतेच्या मनातून उतरवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही अजितदादा यावेळी म्हणाले. पण या संपुर्ण प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात कुणीतरी दुखावला गेल्या असेल त्यामुळेच अशा पद्धतीची माहिती जाणीवपूर्वक लिक केली गेली. पण या संपुर्ण प्रकरणात जोवर संपुर्ण माहिती मिळत नाही तोवर काही बोलण उचित ठरणार नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितलं.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.