Skip to main content

पोलिस दलालाच जनतेच्या मनातून उतरवण्याचा हा प्रयत्न- अजित पवार

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:





परमबीर सिंह यांच्या शंभर कोटीच्या आरोपानंतर पोलिस दलात ट्रान्सफर रॅकेट प्रकरणावर प्रथमच भाष्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झालेल्या फोन टॅपिंगचा अहवाल आजच गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार असल्याची दिली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषदेत पोलिस बदल्यांच्या रॅकेटबाबत आरोप केल्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले होते. त्यामुळेच सीताराम कुंटे यांच्याकडून हा अहवाल आजच मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

तत्कालीन गृह विभागाचे सचिव सीताराम कुंटे हे सध्या मुख्य सचिव आहेत. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाचा अहवाल हा सीताराम कुंटे यांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या अहवालामध्ये नेमकी काय कारवाई करता येईल याबाबतची माहिती असणे अपेक्षित आहे. या संपुर्ण प्रकरणात पोलिस खात्यातील काही लोकांनी अतिशय गंभीर चूक केली आहे. पण ही चूक अतिशय गंभीर असून या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं. संपुर्ण प्रकरणात सरकार किंवा मुख्यमंत्री कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
सीताराम कुंटे हे अतिशय सरळमार्गी अधिकारी आहेत. तसेच अतिशय पारदर्शक अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. बदल्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची माहिती समोर आल्याने कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळेच पोलिस दलालाच जनतेच्या मनातून उतरवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही अजितदादा यावेळी म्हणाले. पण या संपुर्ण प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात कुणीतरी दुखावला गेल्या असेल त्यामुळेच अशा पद्धतीची माहिती जाणीवपूर्वक लिक केली गेली. पण या संपुर्ण प्रकरणात जोवर संपुर्ण माहिती मिळत नाही तोवर काही बोलण उचित ठरणार नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितलं.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.